प्रतापसिंह महादेवसिंह बैस असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तो मूळचा मुंबईच्या विलेपार्ले येथील रहिवासी असून रामटेक येथील नवरगावच्या एका ढाब्यावर स्वयंपाकी म्हणून काम करत होता. मंगळवारी पोलिसांनी ढाब्याच्या मागील जमिनीतून त्यांचा सांगाडा बाहेर काढला असून, एका छोट्या चिठ्ठीमुळे या संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा झाला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
आठ महिन्यांपूर्वी धाब्याचा मालक कैलास ठाकरे यांचा मुलगा पीयूष आणि प्रतापसिंह यांच्यात मोबाईल चोरीवरून वाद झाला होता. पीयूषने प्रतापसिंह यांच्यावर चोरीचा आळ घेतला होता. या वादातून चिडलेल्या पीयूषने प्रतापसिंह यांचा गळा आवळून खून केला आणि त्यांचा मृतदेह धाब्याच्या मागील बाजूस जमिनीत गाडून टाकला होता. प्रतापसिंह यांच्यासोबत काय घडलं? याची काहीच कल्पना कुणालाही नव्हती.
advertisement
खुनाचा उलगडा कसा झाला?
पोलिसांना तपासादरम्यान प्रतापसिंह यांनी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली. ही चिठ्ठी चुरगळलेल्या अवस्थेत होती. त्यावर एकच वाक्य होतं. या वाक्याच्या आधारे पोलिसांनी तपास करत हे हत्याकांड उघडकीस आणलं. "मी कसलीही चोरी केलेली नाही..." असं वाक्य चिठ्ठीवर लिहिलं होतं. चिरगाळून टाकलेल्या या चिठ्ठीच्या अनुषंगाने तपास करत पोलीस आरोपी पीयूषपर्यंत पोहोचले. त्यांनी पीयूषची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मंगळवारी पोलिसांनी फॉरेन्सिक टीमच्या मदतीने घटनास्थळावरून पुरावे गोळा करत प्रतापसिंह यांचा सांगाडाही जमीनीतून बाहेर काढला आहे.
