सातारा जिल्ह्यात होणाऱ्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील पश्चिम भागातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. यामुळे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पर्यटकांना मार्गदर्शक सूचनांचा आदेश काढत पर्यटन स्थळांवर जाण्याबाबत काही सूचना केल्या आहेत. पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेताना दुर्घटना होणार नाही, पर्यटन जीवावर बेतणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
advertisement
जोरदार पडत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक पर्यटक पाण्याच्या प्रवाहाचा विचार न करिता धबधब्यांच्या शेजारी, धबधब्यांखाली उभे राहण्याचे धाडस करतात. यामुळे अपघात होतात तसेच घाटमाथ्यावरून प्रवास करताना पर्यटकांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी मार्गदर्शक सूचनांचे पत्र जारी केले आहे. पर्यटकांनी साताऱ्यात येताना आणि आल्यानंतर काय काळजी घ्यावी याबाबत विशेष आवाहन केले आहे.
पर्यटकांना कोणत्या गोष्टी करता येणार नाही...?
-पर्यटनाला येताना मद्य बाळगू नये
-मद्यपान करून गाडी चालवू नये
-मोठ्याने गाणी वाजवत ध्वनी प्रदूषण करू नये
-धबधब्यांच्या शेजारी, दरी कडेला सेल्फी काढण्यास बंदी