केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत NHAI वरिष्ठांच्या संपर्कात आहे. निवेदनातील मुद्द्यांमध्ये ५० टक्के टोलमाफी द्यावी यासाठी आम्ही केंद्रीय मंत्रालयाशी पत्रव्यवहार करत असल्याची माहिती NHAIने दिलीय. सद्या २५ टक्के टोलमाफी दिली असून उर्वरित टोलमाफीसाठी पाठपुरावा करू अशी माहिती NHAIने दिली आहे. किणी टोल नाक्याच्या २० किमी परिसरात जी गावे आहेत त्या गावातील खासगी वाहनांना १०० टक्के टोलमाफी असून त्यासाठी मासिक पास घ्यावे लागतील असंही NHAIकडून सांगण्यात आलंय. NHAIने आंदोलकांना त्यांचं आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केल्यानंतर काँग्रेसने आंदोलन स्थगित केलं.
advertisement
महामार्गावर अनेक ठिकाणी सुमारे १ ते दीड फूट खोल खड्डे पडले आहेत. पावसात हे खड्डे न दिसल्यामुळं अनेक वाहनं या खड्यात आपटुन वाहनांचे टायर फुटत आहेत. वाहनांचे नुकसान होतंय तर अनेक छोटे मोठे अपघात यामुळं घडत आहेत. पुणे कोल्हापुर हा रस्ता अक्षरश: मृत्युचा सापळा बनला आहे. सरकारनं आणि NHAI नं याकडं लक्ष देवुन लवकरात लवकर हे रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी वाहन चालक प्रवाशांनी केली आहे.
रस्ते वाहतुक मंत्रालय राज्य शासन आणि NHAI हे कधी या समस्येकडं लक्ष देणार हे पाहणे महत्वाचं आहे. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या सर्वांसाठी हा महत्त्वाचा प्रश्न असून खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात अनेकांचा मृत्यू होत आहे. यामुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्त होतात. लवकरात लवकर महामार्गाची दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
