रामराजे यांनी महिन्याभरापूर्वी फलटणमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. तेव्हा त्यांनी तुतारीसंदर्भात वक्तव्य केलं होतं. रामराजे म्हणाले होते की, फलटणमध्ये रणजीत निंबाळकर आणि त्यांच्या साथीदारांची दहशत रोखली पाहिजे असं म्हटलं होतं. माझं भाजपशी काही भांडण नाही. पण एकच तक्रार आहे इथं जी दहशत निर्माण झालीय, जो प्रकार सुरूय त्याविरोधात तक्रार केली आणि वरिष्ठांनी त्यावर कारवाई करावी इतकीच मागणी आहे.
advertisement
वरिष्ठांशी चर्चा करून आपण वेगळा कार्यक्रम घेऊ आणि विषय संपवू. आपल्या तक्रारीची दखल घेतली नाही. आपल्या तक्रारीने फरक पडला नाही तर तुतारी वाजवायला किती वेळ लागतो असंही ते फलटणमधील कार्यक्रमात म्हणाले होते. महाविकास आघाडीत फलटण मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत रामराजे निंबाळकरांची साथ मिळाल्यास शरद पवार गटाची ताकद वाढणार आहे.
