TRENDING:

फडणवीसांच्या हातात सत्ता होती तेव्हा लाडकी बहीण का आठवली नाही, आत्ता दिसली कारण... शरद पवारांचा हल्लाबोल

Last Updated:

राजराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे आणि रघुवीरराजे नाईक निंबाळकर तसेच फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकून शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घेतली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
फलटण (सातारा) : फलटणला मागे मी आलो होते तेव्हा काहीतरी चुकतंय असे वाटत होते. कार्यकर्त्यांच्या डोळ्यात मला भीती जाणवत होती. अनेक सभा घेतल्या मी घेतल्यात. मला लोकांच्या डोळ्यात बघून कळतं त्यांच्या मनात काय सुरू आहे. आज तुमचे डोळे प्रफुल्लित आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सभेला आलो होतो तेव्हा डोळ्यात भीती होती. पण काळजी करू नका. आपल्याला महाराष्ट्र सामान्य लोकांच्या हिताकरिता योग्य हातात द्यायचा आहे, असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले.
शरद पवार-देवेंद्र फडणवीस
शरद पवार-देवेंद्र फडणवीस
advertisement

राजराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे आणि रघुवीरराजे नाईक निंबाळकर तसेच फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकून शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घेतली. या पक्षप्रवेशाला स्वत: शरद पवार, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार अमोल कोल्हे आदी नेते उपस्थित होते.

advertisement

यावेळी केलेल्या भाषणात शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राचे विद्यमान सरकार निवडणुकीच्या तोंडावर नवनवीन घोषणा करीत आहे. सरकारने लाडकी बहीण योजना आणली. प्रत्येकाला बहिणीबद्दल आस्था असतेच. बहिणीचा सन्मानाचा सर्वांनाच आनंद होतो. विद्यमान सरकारला अडीच वर्षांत बहीण आठवली नाही. आधी पाच वर्ष देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार होते तेव्हा बहीण दिसली नाही. पण लोकसभेला ४८ पैकी ३१ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या की यांना बहीण आठवली, अशी फटकेबाजी शरद पवार यांनी केली.

advertisement

बारामतीत यांनी सुप्रियाच्या विरोधात उमेदवार दिला. बारामतीकर खूप हुशार आहे. तिथं बहिण उभी राहिली. प्रचाराला गेलो की लोक बोलायचे नाहीत. गप्प बसायचे...पण निवडणूक झाल्यावर कळले की, लोक राजकारण्यांपेक्षा शहाणे आहेत, असे पवार म्हणाले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! कॉल फॉरवर्डिंगमधून बँक खात होऊ शकतं रिकामं; अशी घ्या काळजी
सर्व पहा

फलटण आणि बारामतीत काही फरक आहे का? आज बारामतीचे चित्र वेगळं दिसते. पलीकडच्या बाजूला मालोजीराव नाईक निंबाळकर यांनी कारखानदारीचा पाया रचला. त्यावेळी काही काम असेल की आम्ही फलटणला यायचो. हा ऋणानुबंध दोन्ही बाजूंनी पाळला गेला, असे आवर्जून पवार यांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
फडणवीसांच्या हातात सत्ता होती तेव्हा लाडकी बहीण का आठवली नाही, आत्ता दिसली कारण... शरद पवारांचा हल्लाबोल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल