शेतकरी कर्ज घेतात, कर्जबाजारी होतात आणि कर्जमाफी मागतात, असे वक्तव्य विखे पाटील यांनी केले होते. ज्यामुळे शेतकरी आणि विरोधकांमध्ये संतापाची लाट उसळली. यानंतर बच्चू कडू यांनी अरे मेहरबानी माना लोक तुम्हाला मारत नाहीत, आम्ही हे सहन करणार नाही' अशा शब्दात आपला संताप व्यक्त करत विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्यास बक्षीस जाहीर केले आहे. मला जर विखे पाटलांची गाडी दिसली तर मी त्यांची गाडी फोडणार असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला.
advertisement
नाव राधाकृष्ण, कृत्य मात्र कंसाची : बच्चू कडू
नाव राधाकृष्ण, कृत्य मात्र कंसाची करायची असेल तर कंसाची ही अवलाद मुख्यमंत्र्यांनी हाकलून लावली पाहिजे अशी मागणी सुद्धा फडणवीसांनी केली. फडवणीस साहेब एकीकडे कर्जमाफीची घोषणा करते हे वाचाळवीर मंत्री असे वक्तव्य करते, एवढं करुन सुद्धा लोक तुम्हाला मारत नाही त्यामुळे ही नालायकी थांबवा असे बच्चू कडू म्हणाले.
काय म्हणाले होतं विखे पाटील?
कर्ज काढायचं, कर्जबाजारी व्हायचं आणी कर्जमाफी मागायची या वक्तव्यामुळे विखे पाटील अडचणीत आले आहेत. मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचं विखे पाटील यांनी म्हटले आहे. निवडणुका आल्या कि सोसायटीचं कर्ज काढलं जातं त्यातून कोणतीही उत्पादकता होत नाही त्यामुळे कर्जबाजारी होऊन कर्जमाफी मागायची असं चक्र सुरू असल्याची सारवासारव करत विरोधकांना कवळ कर्जबाजारीपणा हा मुद्दा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून मी सार्वजनिक जीवनात काम करतोय मात्र मी कधीही बेताल वक्तव्य करत नसल्याचंही विखे पाटील यांनी म्हटले आहे.
