तीन दिवस आधीच पेपर फुटला...
मिळालेल्या माहितीनुसार, एका टेलिग्राम ग्रुपवर गणिताचे दोन्ही पेपर पोस्ट करण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे, गणित भाग-२ चा पेपर चक्क परीक्षेच्या तीन दिवस आधीच या ग्रुपवर टाकण्यात आला होता. सुरुवातीला या अफवा असल्याची चर्चा होती, मात्र बोर्डाने गांभीर्याने घेत याची शहानिशा केली.
बोर्डाकडून पडताळणी आणि पुष्टी
advertisement
टेलिग्रामवर व्हायरल झालेल्या प्रश्नपत्रिका आणि बोर्डाची अधिकृत प्रश्नपत्रिका यांची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत दोन्ही प्रश्नपत्रिका तंतोतंत जुळल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे पेपर फुटल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले असून बोर्डाचे पेपर किती सुरक्षित आहेत, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
पोलीस कारवाई आणि तांत्रिक तपास
या गंभीर प्रकाराची दखल घेत पुणे विभागीय मंडळाने तातडीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी संबंधित टेलिग्राम ग्रुपचे अॅडमिन आणि सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलिसांच्या मदतीने तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे. हा पेपर नेमका कुठून आणि कोणी लीक केला, याचे मूळ शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
या गैरप्रकारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलीस आता या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी वेगाने हालचाली करत आहेत.
बारावीचेही पेपर फुटले...
हाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत नागपूर विभागात रसायनशास्त्र (Chemistry), भौतिकशास्त्र (Physics) आणि गणित (Mathematics) या विषयांचे पेपर फुटल्याचे प्रकार समोर आले आहेत. परीक्षेपूर्वी व्हॉट्सॲपवर पेपर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणीत गुन्हे दाखल करण्यात आले असून काहींना अटकही झाली आहे.
