सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना जामीन मंजूर करताना स्पष्ट केलं आहे की, हा जामीन दोन महिन्यांसाठी आहे. तसंच केवळ वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर करण्यात येत आहे. ईडीकडूनही वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास हरकत घेतली नाही. यामुळे वैद्यकीय कारणासाठी तरी नवाब मलिक यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
मणिपूर जळत रहावं हीच त्यांची इच्छा, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप
advertisement
नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी 2022 रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने अटक केली होती. त्याआधी 8 तास त्यांची चौकशी करण्यात आली होती. मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे नेतेमंडळी होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली होती.
काय आहे प्रकरण?
गोवावाला कंपाउंडमधील जमीन खरेदीत व्यवहारामध्ये मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीने नवाब मलिक यांची चौकशी केली होती. या चौकशीनंतरच ईडीने त्यांना अटक केली होती. दाऊद इब्राहिमच्या टोळीसोबत केलेल्या आर्थिक व्यवहारातून दहशतवाद्यांना अर्थसहाय्य केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. नवाब मलिक गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लबंर या महिलेची तीन एकर जागा कट रचून बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप होता. यामध्ये नवाब मलिक यांच्यासोबत हसीना पारकर, सलीम पटेल आणि १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान यांचीही नावे आहेत.