सदर शेतकरी अल्पभूधारक असल्याने आणि कुटुंबात इतर कोणीही कमावणारे नसल्याने, मुलाचे शिक्षण आणि ओबीसी मराठा आरक्षणाच्या या वातावरणात आपल्या मनावर खोलवर परिणाम झाल्याने नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचा आरोप कुटुंबाने केला. मराठा असो किंवा ओबीसी आत्महत्या हा आरक्षणाला पर्याय नाही, त्यामुळे आत्महत्या करू नका असे आवाहन माजी मंत्री तानाजी सावंत यांनी कुटुंबीयांना केले. सावंत यांनी पीडित कुटुंबाशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
advertisement
राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला होता, त्याची भीती चार दिवसांपूर्वी माणिक भालचंद्र डोईफोडे यांनी कुटुंबासमोर व्यक्त केली होती. माझ्या मुलांना याचा फटका बसेल, अशी चिंता त्यांनी बोलून दाखवली होती. याच कारणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा धाराशिवमध्ये आहे. तशी तक्रारही पोलिसांत दिली गेली. या घटनेनंतर आमदार तानाजी सावंत यांनी अडीच लाख रुपयांची मदत आणि मुलांना शिक्षणासाठी काही मदत लागल्यास मदत करण्याची हमी देखील दिली आहे.