कर्जत-कल्याणला जोडणारा राज्य महामार्ग बदलापूर पूर्वेकडील कात्रप, शिरगांव भागातून जातो. कात्रप परिसरात बाजारपेठ असल्यामुळे वाहनांची वर्दळ नेहमी असते. मात्र, आता न्यू पनवेल हायवेवरून कात्रप ते खरवई जुवेलीपर्यंत बाह्यवळण रस्ता (रिंग रोड) होणार आहे. त्यामुळे बरीच वाहतूक आता शहराच्या बाहेरून होईल. त्यामुळे कात्रप रस्त्यावरचा ताण कमी होणार असून वाहनचालक आणि पादचाऱ्यांची देखील वाहतूक कोंडीतून सुटका होईल.
advertisement
Mumbai Metro: मेट्रोसाठी राज्य सरकारची तिजोरी पुन्हा उघडली! मुंबई-ठाण्याला दिले 462 कोटी
आमदार किस कथोरे हे या रस्त्याला एमएमआरडीएच्या माध्यमातून निधी मिळावा यासाठी प्रयत्नशील होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बदलापूर येथे आले असता त्यांनी शहरातील विकासकामांना भरघोस निधी देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार या रस्त्याच्या कामासाठी 90 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याचे आमदार कथोरे यांनी सांगितले. तसेच या रिंगरोडमुळे महामार्गालगतच्या परिसरातील विकासाला गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, नव्याने होत असलेला रिंग रोड 120 फूट रुंदीचा असणार आहे. त्यामुळे बदलापूर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार आहे. तसेच रिंग रोडशी जोडल्या जाणाऱ्या शिरगांव, जुवेली, मानकिवली, खरवई परिसरातील विकासाला देखील गती मिळणार आहे.