बाजारातील घसरणीची कारणे
अभिषेक मिश्रा यांच्या मते, सध्याच्या बाजारातील अस्थिरतेसाठी अनेक अंतर्गत आणि बाह्य कारणे जबाबदार आहेत.
अमेरिकेचे टॅरिफ धोरण : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवल्याने जागतिक बाजारावर परिणाम झाला आहे.
महागाईचा वाढता दर : देशात वाढत्या महागाईमुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता आहे.
कमकुवत तिमाही निकाल : मोठ्या कंपन्यांचे आर्थिक निकाल अपेक्षेप्रमाणे न आल्याने बाजारात नकारात्मकता पसरली आहे.
advertisement
परदेशी गुंतवणूकदारांचे पैसे काढणे : विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) मोठ्या प्रमाणात पैसे काढत असल्याने बाजारावर दबाव वाढला आहे.
जागतिक अस्थिरता : रशिया-युक्रेन युद्ध,अमेरिका-इराण तणाव आणि जागतिक राजकीय घडामोडींचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे.
गुंतवणूकदार उद्ध्वस्त,सर्वात वाईट काळ; तज्ज्ञांच्या भविष्यवाणीतून समोर आले पुढे
गुंतवणूकदारांनी काय करावे?
चार्टर्ड अकाउंटंट अभिषेक मिश्रा यांनी गुंतवणूकदारांना काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.
घाई करू नका - बाजार घसरत असला तरी घाबरून निर्णय घेणे टाळा.
लाँग-टर्म गुंतवणुकीवर भर द्या - अल्पकालीन गुंतवणुकीऐवजी दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करा.
एकाच ठिकाणी गुंतवणूक करू नका - आपल्या गुंतवणुकीचे विभाजन करा, जेणेकरून जोखीम कमी होईल.
मार्केट ट्रेंड समजून घ्या - बाजाराची सतत माहिती ठेवा आणि त्यानुसारच गुंतवणुकीचे नियोजन करा.
मजबूत कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा - ज्या कंपन्यांचे आर्थिक आधारभूत तत्त्व मजबूत आहे आणि ज्यांचे व्यवस्थापन चांगले आहे, अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी.
90% लोकांच्या बेसिक गरजा पूर्ण होत नाहीत; देश कोण चालवतंय? धक्कादायक Report
कुठे गुंतवणूक करावी?
अभिषेक मिश्रा यांच्या मते, भविष्यात खालील क्षेत्रांमध्ये चांगल्या गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात -
AI (कृत्रिम बुद्धिमत्ता)
इलेक्ट्रिक वाहन क्षेत्र
आरोग्य सेवा (हेल्थकेअर)
IT आणि विज्ञान क्षेत्र
ऊर्जा (एनर्जी सेक्टर)
सिंगल असलेल्या कर्मचाऱ्यांची झोप उडाली
बाजारात गुंतवणूक करण्याआधी नव्या संधी शोधून, योग्य नियोजन करून गुंतवणूक करणे आवश्यक आहे. बाजारातील चढ-उतारांना घाबरण्याऐवजी, दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून योग्य पद्धतीने गुंतवणूक करणे हेच यशस्वी गुंतवणुकीचे गमक असल्याचे मिश्रा म्हणाले.