विधीमंडळात अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केल्यानं सत्ताधाऱ्यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू केलं आहे. अंबादास दानवे यांनी म्हटलं की, मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. मी राजीनामा देणार नाही. माफी मागणार नाही. भाजपने दीडशे खासदारांना निलंबित केलं होतं. त्यांनी संसदीय भाषा, कायदे मला शिकवण्याची गरज नाही.
मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकाच्या बाण्याने केलं आहे. मी पळपुट शेपूट घालणारा थोडी आहे. हिंदुत्व वगैरे प्रसाद लाड सारखे बाडगे शिकवत आहेत. सत्तेसाठी आणि पैशासाठी इकडे तिकडे फिरतात असा आरोपही अंबादास दानवे यांनी केला.
advertisement
अंबादास दानवे यांचं ऑक्टोबरपर्यंत निलंबन करावं अशी मागणी प्रसाद लाड यांच्यासह सत्ताधाऱ्यांनी केली. यावर प्रतिक्रिया विचारली असता अंबादास दानवे म्हणाले की, त्यांना जे करायचंय ते करु द्या, आता त्यांना नियम, संविधान कायदे आठवतायत. याआधी त्यांना कायदे म्हणजे घरची जहागीरदारी वाटायची. शिवसैनिक आहे आणि मी शिवसैनिकाच्या बाण्याने उत्तर दिलंय. विरोधी पक्षनेता आक्रमकच असायला हवा. राष्ट्रपतींकडे, सभापतींकडे जाऊन माझ्या राजीनाम्याची मागणी करावी. सत्ताधाऱ्यांना जे करायचंय ते करावं.