संजय उपाध्याय यांचा तस्करावर संताप
या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. बोरिवलीत खुलेआम अंमली पदार्थांची विक्री सुरू असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संजय उपाध्याय यांनी केला आहे. तरुण पिढी गांजाच्या विळख्यात अडकत असून हे थांबवण्यासाठी कठोर कारवाई गरजेची आहे,असे ते म्हणाले.
गांजा तस्करीचा मुद्दा ऐरणीवर
दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू आहे. कायदा हातात घेणे योग्य नसले तरी गांजा तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडूनही होत आहे. या घटनेमुळे बोरिवलीतील अंमली पदार्थ तस्करीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 2:39 PM IST
