नवरात्री आली जवळ, गरबा खेळताना जाऊ शकतो जीव? हे आधी लक्षात ठेवा, Video
केडीएमसीच्या मुख्यालयात अनेकदा राडे झाले आहेत. याच राड्यावरून पालिका प्रशासनाला लक्ष्य केले गेले आहे होते. त्यामुळे पालिका मुख्यालयात येत असताना कोणत्याही प्रकारचे अग्नीशस्त्र बाळगू नये असा नियम काढला गेला होता.. मात्र आज केडीएमसीत काही विषयावर आयुक्तांसोबत बैठक होती. या बैठकीसाठी स्थानिक काही नेते मंडळी आली होती. त्यांच्यासोबत अग्नीशस्त्रे घेऊन काही अंगरक्षक मुख्यालयात परिसरात उघडपणे फिरताना दिसली. त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडल्यास त्याचा जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत केडीएमसीच्या उपायुक्त वंदना गुळवे यांना पत्रकारांनी विचारणा केली महापालिका आवारात अग्नीशस्त्रे घेऊन येण्याची परवानगी आहे का? त्यावर त्यांनी सांगितले की, आम्ही माहिती घेऊन सांगतो, मात्र कॅमरासमोर बोलण्यास नकार दिलाय.
advertisement
जालन्यात एक दिवसाच्या पावसाने व्यवसायिकांना रडवलं, लाखोंच्या मुद्देमालांचा...
गेल्या काही महिन्यांपूर्वी केडीएमसी क्षेत्रामध्ये अग्नीशस्त्र वापरू नये, असा नियम आयुक्तांनी केला होता. पण तरीही देखील हा नियम धाब्यावर बसवून काही अंगरक्षक महानगर पालिकेच्या मुख्यालयाच्या परिसरात अग्नीशस्त्र वावरताना दिसत आहेत. यांच्यासोबत अनेक नेते मंडळी सुद्धा दिसत आहेत. अग्नीशस्त्र घेऊन वावरत असताना काही चुकीचं घडू नये, ही गोष्ट महत्त्वाची आहे. जर समजा काही घडलंच तर त्याला जबाबदार कोण ? असा सवाल सध्या नागरिक विचारत आहेत. संबंधित प्रकरणाबद्दल पत्रकारांनी केडीएमसीच्या उपायुक्त वंदना गुळवे यांना विचारणा केली असता महापालिका आवारात अग्नीशस्त्रे घेऊन येण्याची परवानगी आहे का? त्यावर त्यांनी सांगितले की, "आम्ही माहिती घेऊन सांगतो." पण त्यांनीही प्रतिक्रिया कॅमेऱ्यासमोर देण्यास नकार दिलाय.