मिळालेल्या माहितीनुसार,मुंबईतील दहिसर पश्चिम येथील गणपत पाटील नगर परिसरात मृत भरत आढाव आणि आरोपी शेजारी शेजारी राहत होते.आज अचानक किरकोळ वादातून भरत आढावचीय त्याच्या शेजाऱ्याने चाकूने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. खरं तर दहिसर पश्चिमेतील गणपत पाटील नगर, गल्ली क्रमांक 5 च्या परिसरात आज सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास दोन तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादातूनच आरोपीने भरत आढाव यांच्यावर चाकूने वारे केले होते. हा हल्ला इतका भयानक होता की मृत तरूण रक्तबंबाळ झाला होता.त्यानंतर काहीच मिनिटांनी या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता.
advertisement
दरम्यान या घटनेत मृत भरत जाधव याची आई छाया भरत यांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांमध्ये होळीच्या दिवशी वाद झाला होता. घराबाहेर बाईक उभी करण्यावरून वाद झाला होता. त्यावेळेस माझ्या मुलाने तु बाईक मला दाराजवळ लावून दे,दाराजवळ बाईक लावली की तु पाहिजे तर मी घरात जाईन,तु बाजूला हो, पण तो बाजूला झाला नाही आणि त्याने भांडण करायला सूरूवात केली हौती.माझ्या मुलावर मारहाण केल्याचा आरोप केला होता. पण माझ्या पोराने काहीच केले नव्हेत, असे मृत भरतच्या आईने सांगितले होते.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच एम.एच.बी. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी तत्काळ मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. तसेच या घटनेनंतर तत्काळ तपासाची चक्रे फिरवत आरोपी तरूणाला तासाभरात अटक केली होती. राजा यादव असे या आरोपीचे नाव आहे. या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला चाकूही पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणामागील नेमके कारण, शत्रुत्व तसेच इतर कोणाचा सहभाग आहे का याचा तपास एम.एच.बी. पोलीस करत आहेत
दरम्यान, या हत्येमुळे गणपत पाटील नगर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे यापूर्वीही या परिसरात तिहेरी हत्याकांड घडल्याने स्थानिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे
या प्रकरणी एम.एच.बी पोलिसांनी आरोपीला अवघ्या तासाभरात अटक केली आहे
