TRENDING:

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर 23 ऑगस्टपासून बंदी, या वाहनांना प्रवेश नाही!

Last Updated:

Mumbai Goa Highway: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई गोवा महामार्गावर 23 ऑगस्टपासून बंदी घालण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची संख्या मोठी असते. त्यामुळे गणेश चुतर्थीच्या काळात मुंबई – गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होते. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई – गोवा महामार्गावर 23 ऑगस्टपासून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या काळात या वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर 23 ऑगस्टपासून बंदी, या वाहनांना प्रवेश नाही!
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर 23 ऑगस्टपासून बंदी, या वाहनांना प्रवेश नाही!
advertisement

27 ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. त्यापूर्वीच कोकणवासी गावाकडे जात असतात. गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर 16 टन व त्यापेक्षा अधिक वजनाच्या वाहनांना 23 ऑगस्टपासून बंदी घालण्यात येणार आहे. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजलेपासून 29 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश राहणार आहेत.

मुंबईकर आता सुस्साट सुटायचं! देशातील सर्वात तीव्र वळणाचा पूल खुला होणार, सांताक्रूझ ते चेंबूर फक्त 35 मिनिटांत पोहोचणार

advertisement

या दिवशीही वाहतूक बंदी

मुंबई – गोवा महामार्गावर 23 ते 29 ऑगस्टसह 2 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 4 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी राहील. तसेच 6 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजलेपासून 8 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपर्यंत बंदी आदेश राहतील, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.

advertisement

दरम्यान, रायगड जिल्हास्तरीय शांतता कमिटी बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल देखील आदी उपस्थित होते.

महामार्गावरील सुविधा

गणेश भक्तांसाठी महामार्गावर तयारी करण्यात आली आहे. सुविधा केंद्रांवर पोलिस मदत केंद्र, आपत्कालीन पोलिस मदत टोईंग व्हॅन, क्रेन, वाहनदुरुस्ती कक्ष, टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा असणार आहे. तसेच वैद्यकीय कक्ष, अॅम्ब्युलन्स सेवा, मोफत आपत्कालीन वैद्यकीय उपचार, बालक आहार कक्ष, मोफत चहा, बिस्कीट, सरबत, पाणी, ओआरएस, महिलांसाठी फिडींग कक्ष देखील असेल.

advertisement

सुरक्षेसाठी सतर्कता

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

गणपती उत्सवादरम्यान जिल्ह्यात पोलिस, होमगार्ड, एसआरपीएफ, अधिकारी, कर्मचारी यांचा बंदोबस्त तैनात राहणार आहे. तसेच या कालावधीत दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी एटीबी व एटीसीची पथके नियुक्त करण्यात येतील. सोशल मीडिया देखरेखीसाठी देखील सायबर सेल सतर्क राहणार आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर 23 ऑगस्टपासून बंदी, या वाहनांना प्रवेश नाही!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल