नेमकं घडलं काय?
8 एप्रिल 2014 रोजी सलमानचा दुचाकी अपघात झाला. या अपघातात त्याच्या उजव्या मांडीचे हाड फ्रॅक्चर झाले होते. त्याला तातडीने गोवंडीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. साधी दुखापत असल्याने काही दिवसांत तो बरा होईल अशी कुटुंबाची अपेक्षा होती. मात्र शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती बिघडू लागली. पुढे त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले, पण 17 एप्रिल 2014 रोजी ‘सेप्टिसेमिया’मुळे त्याचा मृत्यू झाला. अधिकृत कागदपत्रांमध्ये मृत्यू नैसर्गिक दाखवण्यात आला, मात्र आईला याबाबत संशय होता.
advertisement
शिक्षिकेनं दप्तर तपासलं, विद्यार्थ्यांच्या मनाला लागलं, थेट टोकाचं पाऊल, नवी मुंबईत खळबळ
नसीम यांनी डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार ऑपरेशनदरम्यान वीज नसतानाही मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात शस्त्रक्रिया करण्यात आली, जे अत्यंत निष्काळजीपणाचे होते. योग्य वैद्यकीय सुविधा न वापरता उपचार करण्यात आले. तसेच रुग्णाच्या स्थितीबाबत कुटुंबीयांना चुकीची माहिती देण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला. उपचारासंबंधी कागदपत्रे वारंवार मागूनही न देण्यात आल्यामुळे ती जाणीवपूर्वक लपवली किंवा नष्ट केली असावीत, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
या घटनेनंतर नसीम यांनी न्यायासाठी सातत्याने लढा दिला. त्यांनी पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्या, माहिती अधिकाराचा वापर करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि अखेर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अनेक अडथळ्यांनंतर न्यायालयाच्या निर्देशांनुसार संबंधित यंत्रणांनी अहवाल सादर केला.
अखेर पोलिसांनी संबंधित डॉक्टरांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. “माझा मुलगा परत येणार नाही, पण दुसऱ्या कुणाच्या मुलासोबत असे होऊ नये, म्हणून मी लढतेय,” असे नसीम यांनी सांगितले.






