अंथरुणावरच संपवलं आयुष्य
अंशू हा कामगारनगरमधील चाळीत आपल्या काही सहकाऱ्यांसोबत राहत होता. शनिवार,31 जानेवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास तो मद्यधुंद अवस्थेत कामगारनगरच्या गेटजवळ पडलेला होता. तेथील काही मुलांनी ही गोष्ट चहाटपरीचे मालक अक्षय पाटील यांना कळवली. त्यांच्या सांगण्यावरून मुलांनी अंशूला उठवून खोलीत झोपायला पाठवले. यावेळी अंशूचा मोबाइल पाटील यांच्याकडे देण्यात आला.
advertisement
मालकाने मोबाईल दिला अन् निघून गेले
मध्यरात्री सुमारे 12.10 वाजता पाटील अंशूच्या खोलीत गेले. अंशू झोपलेला दिसल्याने त्यांनी मोबाइल त्याच्या सहकाऱ्यांकडे दिला आणि रत्नागिरीकडे रवाना झाले. मात्र त्यानंतर अवघ्या दोन तासांतच अंशू बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दादर पोलिसांसमोर खुनाचं गूढ
रुग्णालयात पोहोचल्यानंतर अंशूच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा आणि गळ्याभोवती लाल जखमा आढळल्या. यावरून त्याचा गळा आवळून आणि मारहाण करून खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. खोलीत झोपताना कोणतीही जखम नव्हती असे पाटील यांनी पोलिसांना सांगितले आहे. त्या दोन तासांत नेमके काय घडले याचा तपास पोलीस करत आहेत.
