सोलार पॅनल स्वच्छ करणे झाले सोपे, विद्यार्थ्यांनी बनवला अनोखा डिव्हाइस, Video
नायगावच्या बीडीडी चाळीतील रहिवाशांना स्वत:च्या मालकीचं 500 चौरस फुटांचे घराचे स्वप्न दिवाळीदरम्यान पूर्ण होण्याची शक्यता आहे. वरळी, ना.म.जोशी मार्ग आणि नायगाव येथील चाळीतील अनेक रहिवाशांना पहिल्या टप्प्यात इमारतीमध्ये पुनर्वसित केले जात आहे. वरळीतील दोन पुनर्वसित इमारतींतील 556 रहिवाशांना घराचा ताबा देण्यात आला आहे. तर नायगावमध्ये पहिल्या टप्प्यात आठ पुनर्वसित इमारतींचे, तर दुसऱ्या टप्प्यातील आणखी तीन इमारतींचे काम सुरू आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील 864 घरांचा समावेश असलेल्या पाच पुनर्वसित इमारतींचे काम अखेर पूर्ण करण्यात आले आहे. लवकरच आता घरांचा ताबा देण्याच्या दृष्टीने पुढील तयारीला मंडळ लागले आहे.x
advertisement
ऑनलाईन घर भाडं भरत असाल तर थांबा! ही बातमी खास तुमच्यासाठी; होणार मोठा बदल
नायगावमधील पाच इमारतींसाठी अग्निशमन दलाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेण्यासाठी मंडळाने अर्ज केला आहे. लवकरच आता मंडळाला अग्निशमन दलाकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर शक्य तितक्या लवकर 864 घरांसाठी निवासी दाखला घेण्यात येईल आणि येत्या 15 दिवसांमध्ये बीडीडी चाळीतल्या रहिवाशांना इमारतीतील घराचा ताबा देण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 864 घरांसाठी 23 मजली इमारतीतील 500 चौरस फुटांच्या घरात लवकरच बीडीडी चाळीतील रहिवाशी राहायला जाणार आहेत. बीडीडी चाळीतल्या रहिवाशांची दिवाळी यंदाची चांगलीच गोड होणार असून ते चांगलेच धुमधडाक्यात त्यांची दिवाळी साजरी करणार आहेत.
नवरात्रनिमित्त सोलापूर शहरात वाहतुकीत मोठे बदल, बंद रस्ते- पर्यायी मार्ग कोणते?
दरम्यान, नायगाव बीडीडी चाळ ६.४५ हेक्टर जागेवर वसली असून त्यामध्ये एकूण ४२ चाळी आहेत. या ४२ चाळींमध्ये एकूण ३,३४४ घरे आहेत. या ४२ चाळींच्या पुनर्विकासाच्या माध्यमातून ३,३४४ रहिवाशांचे पुनर्वसन २३ मजली २० पुनर्वसित इमारतींमध्ये करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आठ, तर दुसऱ्या टप्प्यात १२ पुनर्वसित इमारतींचे बांधकाम करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील आठ इमारतींपैकी पाच इमारतींचे काम पूर्ण झाले आहे आणि आता लवकरच या इमारतींच्या निवासी दाखल्याची प्रक्रिया पूर्ण करून घरांचा ताबा देण्यात येणार आहे.