हत्येचा घटनाक्रम
पूनमला निजाम 18 एप्रिलला पळवून घेऊन गेला होता. 11 दिवस तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली गेली, यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेतला. 27 एप्रिलला उरणमध्ये सुटकेसमध्ये पूनमचा मृतदेह आढळून आला. यानंतर आज मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कुटुंबातील सदस्यांसह पोलीस अधिकाऱ्यांचीही भेट घेतली आहे. तसंच 24 तासांच्या आत आरोपीवर कठोर कारवाई झाली नाही, तर उग्र आंदोलनाचा इशारा मंगलप्रभात लोढा यांनी दिला आहे.
advertisement
काय म्हणाले मंगलप्रभात लोढा?
'निजाम नावाचा टॅक्सी ड्रायव्हर तिला 18 एप्रिलला पळवून घेऊन गेला होता. कल्याणमध्ये या मुलीला घेऊन तो गेला आणि तिची हत्या केली, त्यानंतर त्याने मृतदेह सुटकेसमध्ये भरून निर्जनस्थळी सोडला गेला. दोन दिवसांपूर्वी ही घटना उघडकीस आली, हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे,' असं मंगलप्रभात लोढा म्हणाले.
'मुंबईमधील ही तिसरी घटना आहे, त्यामुळे पोलिसांनी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मुंबईत अनधिकृतपणे राहणाऱ्या रोहिंग्या, बांगलादेशींचा बंदोबस्त करावा लागेल. अन्यथा हिंदू तरुणी, महिला सुरक्षितपणे घराबाहेर पडू शकणार नाहीत. 24 तासाच्या आत आरोपीवर कठोर कारवाई झाली नाही, तर उग्र आंदोलन करू', असा इशारा मंगलप्रभात लोढा यांनी दिला आहे.
या प्रकरणातील आरोपी निजाम खान हा सँडहर्स्ट रोड परिसरात वास्तव्यास होता. नोकरीसाठी जात असताना त्याची आणि पूनमची ओळख झाली, या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.