नेमकं घडलं काय?
मालाडच्या एका गजबजलेल्या भागात विक्रेता फळं विकत होता. उंदरांपासून फळं वाचवण्यासाठी या पठ्ठ्याने डोकं चालवलं, पण ते लोकांच्या जीवावर बेतणारं ठरलं. फळांवर Ratol क्रीम लावताना काही जागरूक नागरिकांनी त्याला रंगेहात पकडलं. लोकांनी जेव्हा त्याला जाब विचारला, तेव्हा त्याने दिलेलं उत्तर ऐकून नागरिक अवाक झाले. उंदीर नुकसान करतात, म्हणून हे लावलंय,असं त्याने निर्लज्जपणे सांगितलं.
advertisement
डॉक्टरांच्या मते, हे औषध किती घातक आहे याची कल्पनाही आपण करू शकत नाही. फळं धुवून खाल्ली तरी त्या विषाचा अंश सालीवाटे आत जाऊ शकतो. यामुळे तीव्र पोटदुखी, उलट्या आणि यकृताचे कायमचे आजार होऊ शकतात. जर एखादं लहान मूल हे फळ खातं, तर त्याच्यासाठी हे जीवघेणं ठरू शकतं. याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्याचं दुकानं सील करण्यात आलं आहे. मात्र या फळविक्रेत्याचा कारनामे पाहून मालाडच्या नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.
या घटनेमुळे बाजारात विक्री होणाऱ्या फळांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे संबंधित प्रकरणात अन्न व औषध प्रशासन तसेच स्थानिक प्रशासनाने तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मालाडमधील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
[video width="480" height="848" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/02/WhatsApp-Video-2026-02-25-at-8.53.56-AM-2026-02-c6d34b2097d4a70d256d0617b895e412.mp4"][/video]
दरम्यान, या घटनेमुळे बाजारात विक्री होणाऱ्या फळांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे संबंधित प्रकरणात अन्न व औषध प्रशासन तसेच स्थानिक प्रशासनाने तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मालाडमधील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
