नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ल्याच्या साबळे नगरातील एका ब्लिडिंग समोर मयत रिक्षाचालक जयराम नायडू (वय48) यांनी त्यांची ऑटो रिक्षा उभी केली होती. पण त्याच वेळी त्यांच्या रिक्षात त्या परिसरातील एक अल्पवयीन मुलगा बसण्यास जात होता,त्यावरुन ऑटो रिक्षा चालकाने मुलाला रिक्षात बसण्यापासून टोकले.
एक नकार अन् एकाचा जीव गेला
ऑटो रिक्षा चालकाच्या बोलण्याचा राग अल्पवयीन मुलाला आला त्याच रागात त्याने सोबत आणलेल्या चाकूने जयराम यांच्या मानेवर थेट वार केला. हा वार इतका गंभीर होता की जयराम जे जागेवर रक्ताच्या थारोळ्यात पडले.
advertisement
रिक्षा चालकासोबत घडलेला प्रकार नागरिकांना समजताच घटनास्थळी गर्दी जमा होऊन त्यांना जवळच्या रुग्णालयात तातडीने नेले मात्र डॉक्टरांनी रिक्षा चालकाला मृत घोषित केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 18, 2026 11:27 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Crime : रिक्षात बसू दिलं नाही, अल्पवयीन मुलांचं डोकं फिरलं, 'त्या' घटनेनं कुर्ला हादरलं!
