TRENDING:

Mumbai Train Accident : धक्कादायक! धावत्या लोकलमधून फेकलेला नारळ डोक्याला आदळला; वसईतील 30 वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू

Last Updated:

Vasai Crime News : धावत्या लोकलमधून फेकलेला नारळ डोक्याला लागल्याने वसईतील तीस वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला होता. मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वसई : मुंबई लोकल रेल्वे ही मुंबई आणि उपनगरातील लाखो लोकांची जीवनवाहिनी म्हणून ओळखळी जाते. परंतु लोकलमधून पडून अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र लोकलमधून पडून नव्हे, तर धावत्या ट्रेनमधून फेकलेल्या नारळामुळे एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. ही घटना शनिवारी सकाळी भाईंदर नायगाव रेल्वे स्टेशनवरील भाईंदर खाडी ब्रिजवर घडली. मृत तरुणाचे नाव संजय भोईर असून वय 25 वर्षे होते.
News18
News18
advertisement

नेमके घडले तरी काय?

मिळालेल्या माहितीनुसार, संजय हा नायगावच्या पाणजू परिसरात वास्तव्यास होता. तो शनिवारी सकाळी साडे आठच्या सुमारास कामावर जाण्यासाठी निघाला. पाणजू हे गाव समुद्राच्या मध्यभागी असल्यामुळे शहरात जाण्यासाठी लोकांना बोटीचा आधार घ्यावा लागतो. संजय गोरेगावमधील एका खासगी कंपनीत काम करत होता.

दरम्यान ,खराब हवामान असल्याने संजयने भाईंदर खाडीवरील पुलावरून नायगाव स्टेशन गाठण्याचा निर्णय घेतला. या पुलावरून चालताना धावत्या लोकलमधून एका प्रवाशाने नारळ फेकला. हा नारळ संजयच्या डोक्याला लागला आणि त्याला गंभीर दुखापत झाली.

advertisement

संजय त्या वेळी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. घटना पाहणाऱ्यांनी ताबडतोब त्याचे घरच्यांना कळवले. त्यानंतर त्याला तात्काळ महानगर पालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले आणि तिथून पुढील उपचारासाठी वसईतील प्लॅटिनियम रुग्णालयात हलवण्यात आले. प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला अखेरीस मुंबईच्या नायर रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले पण उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

संपर्क साधलेल्या गावच्या सरपंचांच्या मते, पाणजू बेटावर यापूर्वीही अशा प्रकारच्या घटनांची कमीतकमी 10 ते 12 नोंद झाली आहे. हे दाखवते की पुलावरून लोकलमधून नारळ फेकणे किंवा इतर वस्तू फेकणे किती धोकादायक ठरू शकते. या घटनेमुळे लोकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. पुलावरून कोणतीही वस्तू फेकल्यास गंभीर अपघात होऊ शकतो आणि यामुळे जीवही जाऊ शकतो. प्रशासनाने लोकांमध्ये या प्रकारच्या वर्तनाबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.

advertisement

तसेच हा प्रकार लोकल रेल्वे प्रवाश्यांच्या हवालदिलपणाचा आणि असावधानतेचा गंभीर परिणाम म्हणून समजला जातो. मुंबईसारख्या मोठ्या शहरात जिथे लोकल प्रवास जीवनावश्यक आहे, अशा घटनांवर तातडीने कारवाई करणे आणि दंडात्मक पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे.

संजय भोईरच्या कुटुंबीयांसाठी ही घटना धक्कादायक ठरली आहे. गावातील लोक आणि प्रशासन यांना या प्रकारचे पुनरावृत्ती होऊ नये म्हणून योग्य पावले उचलण्याची गरज आहे. पुलावरून किंवा लोकलमधून कोणतीही वस्तू फेकणे फक्त कायद्याचे उल्लंघन नाही तर हे मानवी जीवावर थेट धोका निर्माण करणारे आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Train Accident : धक्कादायक! धावत्या लोकलमधून फेकलेला नारळ डोक्याला आदळला; वसईतील 30 वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल