मंत्री प्रताप सरनाईक यांनी नियम 293 अंतर्गत मांडलेल्या प्रस्तावावर विधानसभेत उत्तर दिले. यावेळी वाढते प्रदूषण आणि इंधन दरांतील अस्थिरता पाहता, ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असणार्या एसटीला हरित ऊर्जेची जोड देण्याची गरज व्यक्त केली. या निर्णयामुळे पर्यावरणाचे रक्षण होणार आहे. तसेच इंधन आणि देखभाल खर्चात देखील मोठी घट होईल आणि एसटीची स्थिती सुधारेल, असे सरनाईक म्हणाले.
advertisement
मुंबई-पुणे प्रवास सुसाट, घाटातील कोंडी सुटणार, ‘मिसिंग लिंक’ची डेडलाईन ठरली, वाहतूक कधी सुरू?
दरम्यान, इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्या नागरिकांना सरकारकडून विशेष कर सवलती आणि टोल माफी देण्यात येणार आहे. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर दर 25 किलोमीटर अंतरावर चार्जिंग स्टेशन्स उभारली जातील आणि ही चार्जिंग स्टेशन्स सौर ऊर्जेवर चालवण्याला प्राधान्य दिले जाईल, असेही सरनाईक यांनी सांगितले.
