लोकसंख्येचा स्फोट आणि पायाभूत सुविधांचा बोजवारा
मुंबईत 2024 मध्ये 2.16 कोटी असलेली लोकसंख्या अवघ्या एका वर्षात 1.92 टक्क्यांनी वाढून 2.20 कोटी झाली आहे. ही वाढ दरवर्षी होणारी असून, मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक, घरबांधणी, पाणीपुरवठा, आणि वाहतूक व्यवस्था या सर्वांवर अमानवी ताण निर्माण झाला आहे.
Railway Police: CSMT रेल्वे पोलिसाचा प्रामाणिकपणा! तब्बल 30,00,000 रुपये किमतीचा चेक केला परत!
advertisement
2011 मध्ये 30 लाखांत मिळणारा फ्लॅट, आज 1.02 कोटी रुपये मोजल्याशिवाय शक्य नाही. मागील दशकात घरांच्या किमतींमध्ये 54 टक्के वाढ झाली आहे. सध्या सरासरी 1 BHK चा दर 1 कोटीच्या पुढे आहे, 2 BHK साठी 2.7 कोटी, आणि 4 BHK साठी तब्बल 9 कोटी रुपये मोजावे लागतात. मुंबईतील चौरस फूट दर सध्या 26, 975 रुपये आहे – जो देशातील सर्वाधिक आहे. हा दर मुंबईतील उंच इमारतींचा आहे. मुंबईतील झोपडपट्टी भागातील दरही गगनाला भिडेल असा आहे. त्यामुळे सामान्य माणसांसाठी मुंबईत घर ही स्वप्नवत झाली आहे.
लोकल वाहतेय चौपट भार
मुंबईत वाढती लोकसंख्या यामुळे मुंबईतील घरांच्या किंमतींवर परिणाम तर झालाच आहे. पण या लोकसंख्येचा परिणाम या इतर महत्त्वाच्या गोष्टींवरही झालाय. मुंबई लोकल जिला मुंबईची लाइफ लाईन म्हणतात. तिच्या प्रवासी क्षमतेपेक्षा 4 पट अधिक लोक दररोज प्रवास करतात. तसेच, मुंबईतील रस्त्यांवर असलेली वाहने शहराच्या वाहन क्षमतेपेक्षा 2 पट अधिक आहेत. यामुळे वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.
‘हम दो, हमारे दो, तिसरा हो गया तो मुंबई भेज दो’ अशी म्हणच मुंबईच्या बाबतीत प्रचलित झाल्याचे दिसतेय. देशभरातून रोज नवे तरुण ‘मुंबई पोटाला खायला देते’ या आशेने शहरात दाखल होत आहेत. मात्र, रोजगाराची उपलब्धता आणि घरांचा अभाव यामुळे झोपडपट्ट्यांची संख्या वाढते आहे. मुंबईत जवळपास 40 टक्के जनता झोपडपट्ट्यांमध्ये राहते.
इतिहास जपणाऱ्या बेटांवर संकट
सात बेटांपासून सुरू झालेल्या मुंबईने पोर्तुगीज, इंग्रज आणि स्वातंत्र्यलढ्यातून वाटचाल करत आर्थिक राजधानीपर्यंतचा प्रवास केला. पण आज ही मुंबई लोकसंख्या आणि विकास नियोजनाच्या अतिरेकाने गुदमरत आहे. 1906 मध्ये जिथे मुंबईची लोकसंख्या 10 लाख होती, आज तिथे 2 कोटींहून अधिक लोक राहतात – आणि भविष्यात हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईला श्वास देण्याची गरज
शहराच्या पायाभूत सुविधांची दुरवस्था, वाढती लोकसंख्या, महाग घरबांधणी, आणि प्रदूषणाच्या संकटात मुंबई अडकली आहे. आता गरज आहे दृष्टिकोन बदलण्याची, शाश्वत नियोजनाची आणि लोकसंख्या नियंत्रणाची. अन्यथा, ‘स्वप्नांची नगरी’ असलेली मुंबई भविष्यात केवळ गर्दी, गोंधळ आणि गुदमरलेल्या श्वासांचं शहर बनून राहील.