मोठ्या क्षमतेचे ‘AWACS’ विमान
या प्रकल्पांतर्गत IAF ला सहा Airbus A321 विमानांचा वापर करून आधुनिक AWACS प्लॅटफॉर्म मिळतील. हे विमान शत्रूच्या लढाऊ विमानांची, जमिनीवरील सेन्सर्सची आणि इलेक्ट्रॉनिक हालचालींची लांब पल्ल्यापर्यंत ओळख करू शकतील. एवढंच नव्हे, तर ही विमाने आकाशातच एक ऑपरेशनल कमांड सेंटर म्हणूनही काम करतील.
DRDO कडून नेतृत्व
या यंत्रणांचा विकास संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) कडून करण्यात येणार असून यात अनेक खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय कंपन्यांचा सहभाग असेल. या प्रक्रियेमुळे स्वदेशी संरक्षण उद्योगालाही मोठा चालना मिळणार आहे.
advertisement
Air India विमानांचा पुनरुच्चार
IAF कडे आधीपासून असलेली Air India ची सहा A321 विमाने आता AWACS प्रकल्पासाठी पुन्हा डिझाईन केली जातील. त्यावर मोठे डॉर्सल फिन्स बसवले जातील, जे 360 डिग्री रडार कव्हरेज देतील. यामध्ये स्वदेशी मिशन कंट्रोल सिस्टम आणि अत्याधुनिक AESA (Active Electronically Scanned Array) रडार तंत्रज्ञान वापरले जाईल.
'नेत्र MkII' अंतर्गत प्रकल्प
AWACS India प्रकल्प हा DRDO च्या ‘नेत्र MkII’ या कार्यक्रमाअंतर्गत विकसित केला जात आहे. याआधीही केंद्र सरकारने DRDO ला पाचव्या पिढीतील मल्टीरोल कॉम्बॅट विमान (AMCA) प्रोटोटाइप तयार करण्यास मान्यता दिली होती. यामुळे भारत संरक्षण क्षेत्रात आता केवळ आयात करणारा नव्हे, तर एक विश्वसनीय उत्पादक देश बनत असल्याचे स्पष्ट होत आहे.
तांत्रिक आत्मनिर्भरतेकडे भारताचा वाटचाल
या प्रकल्पामुळे भारत Boeing या आघाडीच्या कंपन्यांशी स्पर्धा करत Airbus A321 सारख्या विमानांचा संरक्षण क्षेत्रात प्रथमच वापर करणार आहे. ही एक तांत्रिक प्रगतीची मोठी पावले असून भविष्यात यामुळे निर्यातीच्या संधींनाही चालना मिळणार आहे.
विद्यमान क्षमता व मर्यादा
सध्या IAF कडे इज्रायल-रशिया सहकार्याने बनवलेली IL76 आधारित तीन ‘फाल्कन’ यंत्रणा आहेत. परंतु त्यांना तांत्रिक अडचणी व देखभालीच्या मर्यादा भेडसावत आहेत. तसेच DRDO ने विकसित केलेली दोन लहान 'नेत्रा' विमाने भारत-पाक संघर्षाच्या वेळी यशस्वीपणे वापरण्यात आली होती.
तीन वर्षात पूर्ण होणार
सरकारच्या मंजुरीनंतर आता 3 वर्षांच्या आत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे केवळ भारताच्या हवाई सुरक्षेचे सामर्थ्यच वाढणार नाही. तर ‘मेक इन इंडिया’च्या तत्वाला अनुसरून स्वदेशी संरक्षण उत्पादन आणि तांत्रिक आत्मनिर्भरता यांच्याही दिशेने भारत मोठी झेप घेईल.