याबाबत मिळालेली माहिती अशी की, बस २७ डिसेंबर रोजी रात्री साडे आठच्या सुमारास आरोनला जाण्यासाठी निघाली. अर्ध्या तासाने ९ च्या सुमारास बजरंगगढ ठाण्याच्या अलिकडे ५ किमी अंतरावर वेगवान डंपरला बस धडकली. ही धडक इतकी भीषण होती की बस उलटली. त्यानंतर आग भडकली. आग लागल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. लोकांना काही समजण्याच्या आतच आगीने रौद्र रुप धारण केलं. या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला.
advertisement
सिकरवार ट्रॅव्हल्सची बस २०२२ च्या १७ फेब्रुवारीपासून अनफिट होती. तरीही ती चालवली जात होती. धक्कादायक बाब म्हणजे या बसचा विमा नव्हता. या प्रकरणी आरटीओचा बेजबाबदारपणाही समोर आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पाच मृतदेह बाहेर काढले आहेत. मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 28, 2023 6:23 AM IST