TRENDING:

Aravallis Hills: अखेर केंद्र सरकारचं एक पाऊल मागे, अरवलीमध्ये नव्या माइनिंगसाठी पूर्णपणे बंदी

Last Updated:

आता अरवलीच्या कुठल्याही भागात नव्याने उत्खननाला परवानगी मिळणार नाही. हा नियम संपूर्ण परिसरात लागू होईल, असं पर्यावरण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दिल्ली:  राजस्थानच्या पर्वतमाला अरवलीच्या डोंगरामध्ये उत्खननाच्या मुद्यावर अखेरीस केंद्र सरकारने माघार घेतली आहे. अरवलीच्या डोंगरांमध्ये अवैध उत्खनन करणाऱ्यांवर केंद्र सरकारने कारवाई केली आहे. सरकारने संपूर्ण अरवली रेंजमध्ये नव्या माइनिंग लीज देण्यावर पूर्ण बंदी घातली आहे. या आदेशामुळे खाण माफियांना दणका बसला आहे. आता अरवलीच्या कुठल्याही भागात नव्याने उत्खननाला परवानगी मिळणार नाही. हा नियम संपूर्ण परिसरात लागू होईल, असं पर्यावरण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
aravali hills
aravali hills
advertisement

न्यूज १८ नेटवर्कने या प्रकरणी बातमी प्रसिद्ध केल्यानंतर अखेरीस याचा दखल घ्यावी लागली. पर्यावरण आणि पाण्याच्या पातळीवर कोणताही तडजोड केला जाणार नाही, असं सरकारने स्पष्ट केलं आहे.  मात्र, या निर्णयामुळे राजकारणही तापलं आहे. काँग्रेसने सरकारच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले आहेत. माजी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी सरकारवर आरोप केले आहे. 'सरकार अरवलीची 'परिभाषा' बदलून लोकांना गोंधळात टाकत आहे. एकीकडे सरकार मायनिंग थांबवत आहे, तर दुसरीकडे सरकारच्या धोरणातच स्पष्टता नाही' अशी टीका रमेश यांनी केली.

advertisement

दरम्यान, केंद्र सरकारच्या आदेशानुसार, अरवलीच्या संपूर्ण परिसरात कुठल्याही नव्या खनन पट्ट्याला मंजुरी दिली जाणार नाही. याचा उद्देश अरावलीला 'निरंतर भूगर्भीय रिज'  (Continuous Geological Ridge)  म्हणून वाचवणं आहे. दिल्ली-एनसीआर ते गुजरातपर्यंत पसरलेली ही पर्वतरांग तुटू नये. अवैध आणि अनियंत्रित खननामुळे याला मोठा धोका पोहोचला आहे, असं सरकारचं आता म्हणणं आहे.

'नो-गो झोन' 

advertisement

हा बंदीचा नियम संपूर्ण अरावली क्षेत्रावर लागू होईल. म्हणजे आता डोंगर फोडून नव्या खाण बनवण्याची परवानगी मिळणार नाही. फक्त बंदीच नाही, मंत्रालयाने 'इंडियन काउंसिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च अँड एज्युकेशन' (ICFRE) ला मोठी जबाबदारी दिली आहे. ICFRE ला संपूर्ण अरवली क्षेत्रात अशा भागांची ओळख करायची आहे जिथे खनन पूर्णपणे बंद असावं. हे काम पर्यावरण आणि भूगर्भशास्त्र लक्षात घेऊन केलं जाईल.

advertisement

ICFRE एक व्यापक आणि विज्ञानाधारित 'सस्टेनेबल माइनिंग मॅनेजमेंट प्लान' तयार करेल. या प्लानमध्ये पर्यावरण किती भार सहन करू शकतं हे पाहिलं जाईल. संवेदनशील भागांची ओळख केली जाईल. विशेष म्हणजे हा प्लान लोकांसमोर ठेवला जाईल जेणेकरून लोक आपली मतं देतील आणि आपल्या हरकती नोंदवतील.  याचा उद्देश अशा जागा वाढवणं आहे जिथे खनन पूर्णपणे बंद असेल.

advertisement

जुन्या खदानांचं काय? त्या चालू राहतील का?

सरकारने सध्या चालू असलेल्या खदानांना तात्काळ बंद करण्याचा आदेश दिलेला नाही, पण त्यावर नियंत्रण आणलं आहे. आदेशात म्हटलं आहे की, ज्या खदानांमध्ये सध्या काम चालू आहे, तिथे राज्य सरकारांनी पर्यावरणाच्या नियमांचं काटेकोर पालन करावं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच काम होईल. चालू माइनिंगवर अतिरिक्त बंदी घातली जाईल जेणेकरून पर्यावरणाला कमीत कमी नुकसान होईल. अरवलीच्या इकोसिस्टमला वाचवण्यासाठी ते वचनबद्ध आहेत कारण हे वाळवंट वाढू नये आणि पाण्याचा पुनर्भरण होण्यासाठी मदत करतं, असं सरकारने स्पष्ट केलं.

सरकार खोटं बोलतंय, काँग्रेसचा आरोप

दरम्यान, सरकारच्या या भूमिकेवर  काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी टीका केली आहे. त्यांनी पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्यावर लोकांना गोंधळात टाकण्याचा आरोप केला आहे.  'अरवलीच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री खरं सांगत नाहीत.  सरकार अरवलीच्या परिभाषेत जे बदल करत आहे, त्यात मोठ्या त्रुटी आहेत. भारतीय वन सर्वेक्षण, सुप्रीम कोर्टाची समिती आणि न्याय मित्र  (Amicus Curiae) यांनी या नव्या परिभाषेचा विरोध केला होता.

फक्त 0.19% भागातच माइनिंग -मंत्री भूपेंद्र यादव

याआधी सोमवारी भूपेंद्र यादव यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळले होते.  काँग्रेस चुकीची माहिती पसरवत आहे. अरवली पर्वतरांगेच्या फक्त 0.19 टक्के भागातच कायदेशीर खनन चालू आहे. मोदी सरकार अरावलीच्या सुरक्षेसाठी आणि पुन्हा हिरवळ वाढवण्यासाठी पूर्णपणे गंभीर आहे. सरकारचं  नियम सुलभ नाही तर कठोर केले जात आहेत जेणेकरून अवैध खनन थांबवता येईल, असं भूपेंद्र यादव म्हणाले.

अरवली का गरजेचं?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
चिकन, मटणपेक्षा महाग झाली ही भाजी, प्रोटीनच्या बाबतीत मासेही काहीच नाही!
सर्व पहा

अरवली पर्वतरांग उत्तर-पश्चिम भारताची 'फुफ्फुसं' आणि 'भिंत' मानली जाते. ही थार वाळवंटाला पूर्वेकडे (दिल्ली आणि उत्तर प्रदेशकडे) वाढू देत नाही. ही भूजल पुनर्भरणात महत्त्वाची भूमिका बजावते आणि दिल्ली-एनसीआरला धुळीच्या वादळांपासून वाचवते. जर अरवली संपली, तर दिल्ली आणि आसपासचा भाग वाळवंटात बदलू शकतो.

मराठी बातम्या/देश/
Aravallis Hills: अखेर केंद्र सरकारचं एक पाऊल मागे, अरवलीमध्ये नव्या माइनिंगसाठी पूर्णपणे बंदी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल