आयोगाने प्रक्रिया स्पष्ट केली
अंतिम मतदार यादी (Draft Voter List) प्रकाशित झाल्यानंतर तिच्या डिजिटल आणि प्रत्यक्ष प्रती सर्व राजकीय पक्षांना दिल्या जातात आणि आयोगाच्या वेबसाइटवरही त्या उपलब्ध केल्या जातात. त्यानंतर मतदार आणि राजकीय पक्षांना आक्षेप आणि दावे दाखल करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला जातो. अंतिम यादी प्रकाशित झाल्यानंतरही तिची प्रत राजकीय पक्षांसोबत शेअर केली जाते आणि ती ऑनलाइनही उपलब्ध असते. कोणत्याही त्रुटीवर अपील करण्यासाठी दोन स्तरांची प्रक्रिया आहे. पहिले अपील जिल्हा दंडाधिकारी (DM) यांच्याकडे आणि दुसरे अपील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) यांच्याकडे करता येते.
advertisement
पारदर्शकतेवर भर
संपूर्ण प्रक्रियेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पारदर्शकता असून प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्ष आणि मतदारांना त्रुटी कळवण्याची संधी दिली जाते, असे निवडणूक आयोगाने सांगितले. अलीकडे काही राजकीय पक्ष आणि व्यक्ती सध्याच्या व जुन्या मतदार यादीतील त्रुटींचा मुद्दा उपस्थित करत आहेत. तर ही त्रुटी दुरुस्त करण्याची योग्य वेळ दावे-आक्षेप कालावधीत (Claims & Objections Period) असते.
आयोगाचा संदेश पुन्हा एकदा
निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, ते आजही राजकीय पक्ष आणि मतदारांनी मतदार यादीची तपासणी करण्याचे स्वागत करतात. शुद्ध मतदार यादीमुळे लोकशाही अधिक मजबूत होईल, हेच आयोगाचे उद्दिष्ट नेहमीच राहिले आहे.