TRENDING:

लेहमध्ये भाजप कार्यालय पेटवले, हिंसाचारात 4 ठार, 30 हून अधिक जखमी; आंदोलकांचा पोलिसांवर हल्ला

Last Updated:

Protests in Leh: लेह एपेक्स बॉडीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून भाजप कार्यालयासह पोलिस वाहनांना आग लावण्यात आली. पोलिसांशी झालेल्या चकमकीत चार ठार तर 30 हून अधिक जखमी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

लेह: लेह एपेक्स बॉडी (LAB) च्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागले. आंदोलकांनी पोलिसांशी संघर्ष करत शहरातील भाजप कार्यालयाला आग लावली. आंदोलकांनी केंद्र सरकार आणि प्रशासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला.

या चकमकीत किमान चार जण ठार झाले आणि 30 हून अधिक लोक जखमी झाले. आंदोलकांचा दावा आहे की हे मृत्यू पोलिसांच्या गोळीबारात झाले. हाती आलेल्या माहितीनुसार LAB च्या युवक शाखेने आंदोलन आणि बंदची हाक दिली होती. कारण सप्टेंबर 10 पासून सुरू असलेल्या 35 दिवसांच्या उपोषणातील 15 पैकी दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने मंगळवारी रात्री त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले होते.

advertisement

सोमन वांगचुक यांची भूमिका

हवामान कार्यकर्ते सोमन वांगचुक हेही या आंदोलनाचा भाग होते. मात्र आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर त्यांनी आपला 15 दिवसांचा उपवास संपवला. सोमवारी LAB ने घोषणा केली होती की- राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीअंतर्गत लडाखचा समावेश होईपर्यंत ते उपोषण संपवणार नाहीत.

advertisement

हिंसाचाराची दृश्ये

शहरातील भाजप कार्यालयाला आग लावतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. जाड धूर परिसरातून उठताना दिसत होता. आंदोलकांनी अनेक वाहनांना, ज्यात पोलिस व्हॅनचाही समावेश होता, आग लावली. तसेच दगडफेक करत भाजप कार्यालयाला लक्ष्य केले.

मोठ्या प्रमाणावर पोलिस दल तैनात करण्यात आले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी टिअरगॅस आणि लाठीमार केला. युवकांच्या गटाने दगडफेक सुरू केल्यानंतर ही कारवाई झाली. अधिकृतरीत्या कोणत्याही जखमींचा अहवाल मिळालेला नाही.

advertisement

सोमन वांगचुक यांनी X वर व्हिडिओ संदेश जारी करून शांततेचे आवाहन केले आणि युवकांना हिंसा थांबवण्याची विनंती केली.

लडाखमध्ये कलम 163 लागू

दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थिती पाहता भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 163 लागू केले आहे. त्यानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांची जमावबंदी आहे. कोणतेही मोर्चे, रॅली किंवा मिरवणुका जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय करता येणार नाहीत. तसेच लोकशांततेला धक्का पोहोचवणारे कोणतेही विधान करणे बंदी घालण्यात आले आहे.

advertisement

हे पाऊल अशा वेळी उचलण्यात आले आहे जेव्हा LAB ने केंद्र सरकारसोबत तातडीने बैठक घेण्याची मागणी केली होती आणि लोकांचा संयम सुटत चालल्याचा इशारा दिला होता.

केंद्र सरकारसोबत चर्चा

गृह मंत्रालयाने जाहीर केले आहे की- पुढील चर्चेची फेरी 6 ऑक्टोबर रोजी लडाखच्या प्रतिनिधींसोबत घेतली जाईल.

LAB आणि वांगचुक यांची मागणी

सोमन वांगचुक यांनी सांगितले की- भाजपने लडाखला सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी हेही स्पष्ट केले की हे आश्वासन आगामी हिल कौन्सिल निवडणुकीपूर्वी पूर्ण व्हायला हवे. जर त्यांनी वचन पूर्ण केले तर लडाखमधील जनता भाजपला मत देऊन विजयी करेल. अन्यथा याउलट होईल. आम्हाला आशा आहे की अर्थपूर्ण चर्चा होईल.

ते पुढे म्हणाले की- लोक विलंबामुळे अधीर होत आहेत. आमचे आंदोलन शांततापूर्ण आहे. पण लोक म्हणत आहेत की शांततेत काही मिळत नाही. आम्हाला भारतासाठी लाजिरवाणे काहीही घडू द्यायचे नाही. शांतता राखली गेली तरच बरे होईल. आमच्या मागण्या गेली पाच वर्षे प्रलंबित आहेत. भारताचे संविधान दोन वर्षांत तयार झाले, मग इतका वेळ का लागत आहे?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शब्दांचा जादुगार! मराठी कविता 32 भाषांत अन् गुजराती अभ्यासक्रमात, कवी कोण?
सर्व पहा

मराठी बातम्या/देश/
लेहमध्ये भाजप कार्यालय पेटवले, हिंसाचारात 4 ठार, 30 हून अधिक जखमी; आंदोलकांचा पोलिसांवर हल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल