'टाईम्स ऑफ इंडिया'च्या एका रिपोर्टनुसार या संदर्भात मुळचे काश्मिरी नसलेल्या विद्यार्थ्यांकडून तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर या विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. फटाके फोडले. काही लोकांनी यावर आक्षेप घेतला असता त्यांनाही या विद्यार्थ्यांनी धमकावल्याची माहिती समोर येत आहे.
तौकीर भट, मोहसिन फारूक, आसिफ गुलजार वार, उमर नजीर डार, सैयद्द खालिद बुखारी, समीर राशिद मीर आणि उबैद अहमद अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावं आहेत. या सर्वांवर UAPA अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याबाबत ज्या विद्यार्थ्यानं तक्रार दिली, त्याने आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं की, ऑस्ट्रेलियाचा विजय झाल्यानंतर पाकिस्तानच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता. तक्रारकरता विद्यार्थी या विद्यापीठामध्ये पशुपाल विभागामध्ये शिक्षण घेत आहे.
advertisement