ते पुढे म्हणाले की, देशाच्या इतिहासातील या परिवर्तनशील काळात सेवा देणे हा एक खरा सन्मान होता. धनखड यांनी ऑगस्ट 2022 मध्ये भारताच्या उपराष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारली होती. यावर्षी मार्चमध्ये त्यांना हृदयाशी संबंधित त्रास झाल्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात चार दिवस दाखल करण्यात आले होते.
उपराष्ट्रपती धनखड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाबद्दल आपल्या मनःपूर्वक कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. त्यांनी नमूद केले की, पंतप्रधानांचा सहकार्य आणि पाठिंबा अमूल्य होता. या पदावर असताना मला खूप काही शिकायला मिळाले. धनखड यांनी संसद सदस्यांकडून मिळालेल्या आपुलकी, विश्वास आणि प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि म्हटले की, ही भावना मी कायम स्मरणात ठेवेन आणि हृदयात कोरून ठेवीन.
advertisement
आता पुढे काय? नवे उपराष्ट्रपती कोण?
उपराष्ट्रपती धनखड यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय संविधानानुसार 60 दिवसांच्या आत उपराष्ट्रपती पदासाठी औपचारिक निवडणूक घेणे बंधनकारक आहे. या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभा – दोन्ही सभागृहांतील सर्व सदस्य सहभागी होतात. प्रमाण प्रतिनिधित्व प्रणाली आणि एकल हस्तांतरणीय मतपद्धती यांचा या निवडणुकीत वापर केला जातो.
भारतीय संविधानानुसार उपराष्ट्रपती पद रिक्त झाल्यास राज्यसभेचे उपसभापती 'कार्यकारी सभापती' म्हणून जबाबदारी पार पाडतात. सध्या हरिवंश नारायण सिंह हे उपसभापती आहेत. सिंह यांची नियुक्ती ऑगस्ट 2022 मध्ये नियुक्ती झाली होती. धनखड यांच्या राजीनाम्यामुळे सध्या तात्पुरते हे कर्तव्य सिंह पार पाडतील.
जगदीप धनखड यांचा राजकीय प्रवास
धनखड यांचा जन्म 1951 मध्ये झाला. त्यांनी 1989 मध्ये झुंझुनू लोकसभा मतदारसंघातून 9व्या लोकसभेसाठी निवडणूक जिंकली. 1990 मध्ये ते संसदीय कार्य मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम पाहत होते. यानंतर 1993 ते 1998 या कालावधीत त्यांनी अजमेर जिल्ह्यातील किशनगड मतदारसंघातून राजस्थान विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. धनखड यांनी 30 जुलै 2019 ते 18 जुलै 2022 या कालावधीत पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही जबाबदारी पार पाडली.
