इफ्तार पार्टीच्या व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजप आणि हिंदूत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय जनता युवा मोर्चाचे महानगर अध्यक्ष रजत जयस्वाल यांनी कोतवाली स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर आठ तासातच पोलिसांनी 14 जणांना अटक केली आहे.
नेमकं काय प्रकरण आहे?
काशीमध्ये गंगा नदीपात्रात इफ्तार पार्टी साजरी करण्यासाठी एका युवकाने मोठी नाव बुक केली होती. या इफ्तार पार्टीला त्यांना रोजा ठेवणाऱ्या त्याच्या मित्रांना बोलावले होते. त्यानंतर या सर्वांनी अस्सी घाट ते नमो घाट नावेतून प्रवास केला. दरम्यान या प्रवासात त्यांनी नमाज पठण केले आणि फळ, खजूर खात रोजा सोडला. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एका मोठ्या पातेल्यातून काहीतरी पदार्थ काढण्यात आला. भाजयुमो महानगरचे अध्यक्ष रजत जयस्वाल यांनी आरोप केला आहे की, या पातेल्यात बिर्याणी होती. नावेत इफ्तार पार्टीसाठी आलेल्या सर्वांनी बिर्याणी खाल्ली आणि नंतर त्याची हाडं पवित्र गंगा नंदीच्या पात्रात फेकल्याचा आरोप करत पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
advertisement
[video width="1920" height="1080" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/iftar-party-2026-03-16f8316b83789418b9a0bca5bba6b44b.mp4"][/video]
गंगा ही भारती यांसाठी केवळ एक नदी नाही, ती जीवनदायिनी आणि मोक्षप्रदायिनी आहे. गंगा नदीचे पाणी हे पवित्र असून अनेक जण पाणी ग्रहण देखील करतात. जे धर्म अवलंबतात, त्यात दैवी आणि मानवी मूल्ये यांना महत्त्व देतात, त्या लोकांसाठी गंगा ही सर्वार्थाने ‘माता’ आहे. अशा पवित्र गंगा नदीपात्रात बिर्याणी खाऊन त्याची हाडे फेकण्याचा प्रकार निंदनीय आहे. हा प्रकार जाणूनबुजून हिंदू धर्मियांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न आहे. एवढच नाही तर नाव चालकाच्या विरोधात देखील कडक कारवाईची मागणी जयस्वाल यांनी केली आहे.
