TRENDING:

Setu Kendra: दाखला काढायचं टेन्शनच नाही, आता सेतु केंद्रच येणार दारी, मुंबईत अनोखा उपक्रम

Last Updated:

Setu Kendra: नागरिकांना घराजवळच आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध व्हावीत, यासाठी मुंबईत एक उपक्रम राबवण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: विविध सरकारी आणि खासगी कामासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जातीच्या दाखल्यासारख्या कागदपत्रांची गरज पडते. ही कागदपत्रे काढण्यासाठी अनेकदा नागरिकांना सेतु केंद्रात चकरा माराव्या लागतात. नागरिकांचा हा ताण कमी व्हावा आणि त्यांना घराजवळच आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध व्हावीत यासाठी मुंबईत एक उपक्रम राबवण्यात आला आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने फिरती 'सेतु' केंद्र सुरू केली आहेत. बुधवारी (17 सप्टेंबर) पालकमंत्री आणि माहिती-तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं.
दाखला काढायचं टेन्शनच नाही, आता सेतु केंद्रच येणार दारी, मुंबईत अनोखा उपक्रम
दाखला काढायचं टेन्शनच नाही, आता सेतु केंद्रच येणार दारी, मुंबईत अनोखा उपक्रम
advertisement

आदिवासी, कोळी समाज, झोपडपट्टीवासीयांसह सर्वसामान्य नागरिकांपर्यंत लवकर सेवा पोहोचवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला. शेलार म्हणाले, "सेवा पंधरवाडाअंतर्गत होत असलेल्या या कार्यक्रमात 'प्रधान सेवक' या भावनेतून लोकांसाठी सेवा उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे. फिरते 'सेतु' केंद्र हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. याबाबत मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचं अभिनंदन."

advertisement

Metro-3: दक्षिण मुंबईचा प्रवास होणार सुस्साट! 'या' दिवशी होणार मेट्रो-3च्या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन

374 आपले सरकार सेवा केंद्र

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरिवली, कुर्ला व अंधेरी या तहसील कार्यालयांतील सुविधा केंद्र हे अत्यंत अद्ययावत व आधुनिक करण्यात येत आहेत. तसेच जिल्ह्यात नव्याने वॉर्डनिहाय 374 'आपले सरकार' सेवा केंद्र सुरू करण्यात आली आहेत.

advertisement

नागरिकांना तत्काळ सेवा मिळण्यासाठी जिल्ह्यात प्रथमच फिरते 'सेतु' केंद्र व आधार केंद्र बळकट करण्याकरिता आधार नोंदी संच वितरित करण्यात येत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. नागरिकांना तत्काळ सेवेचा लाभ मिळावा यासाठी सर्व दाखले व्हॉटस्अॅपवर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

काय आहे सेवा पंधरवडा अभियान?

छत्रपती शिवाजी महाराज 'महाराजस्व अभियानां'तर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालाधीमध्ये 'सेवा पंधरवाडा' अभियान राबवण्यात येत आहे.

advertisement

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Setu Kendra: दाखला काढायचं टेन्शनच नाही, आता सेतु केंद्रच येणार दारी, मुंबईत अनोखा उपक्रम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल