महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि समावेशक विकासावर संपूर्ण लक्ष केंद्रीत करत कल्याणकारी प्रशासन समर्थपणे चालवत तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या परिवर्तनकारी कारकिर्दीवर मोदी यांनी प्रकाश टाकला.
पंतप्रधानांनी त्यांच्यासोबत झालेल्या संतोषजनक संवादाचे स्मरण केले. या महिन्याच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदींनी त्यांच्या जीवनाबद्दल आणि कार्याबद्दल व्यक्त केलेले विशिष्ट विचार यावेळी सामायिक केले आहेत.
advertisement
आपल्या ‘एक्स’ पोस्टमध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे:
“जयललिताजी यांचे त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण. त्यांनी एक अत्यंत प्रभावशाली नेता आणि उत्कृष्ट प्रशासक म्हणून असंख्य लोकांच्या हृदयात आणि मनात स्थान निर्माण केले होते. त्यांचा जीवन प्रवास प्रचंड धैर्य आणि दृढनिश्चयाने भरलेला होता. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून, महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि समावेशक विकासावर भर देऊन कल्याणकारी प्रशासनाचे समर्थन केले. त्या संवेदनशील तसेच निश्चयी होत्या. त्यांच्याशी झालेल्या संतोषजनक संवादांचे मी स्मरण करतो.”
