Bigg Boss Marathi 6 च्या घरातील 'शापित' कोपरा! इथं जो गेला तो 'गायब'च झाला, नेमकं काय घडलं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 च्या घरातील या कोपऱ्यात जो सदस्य गेला तो बिग बॉसच्या घरातून कायमचा बाहेर गेला आहे.
advertisement
1/9

बिग बॉसच्या घरात किचन, लिव्हिंग रूम, डायनिंग एरिया, बाथरूम, स्टोअर रूम, गार्डन एरिया असे वेगवेगळे भाग आहेत. जिथं सदस्य वावरतात. असाच बिग बॉस मराठी 6 च्या घरातील एक कोपरा ज्याला शापित म्हणायला हरकत नाही. कारण जो कुणी इथं गेला तो घरातून कायमचा गायब झाला आहे.
advertisement
2/9
बिग बॉस मराठी 6 हा सुरुवातीपासूनचा सीझन जर तुम्ही पाहिला असेल तर ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. नाहीतर बिग बॉसच्या घरातील असा हा कोपरा नेमका आहे तरी कोणता हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.
advertisement
3/9
तुम्हाला माहिती आहे बिग बॉसच्या घरातील कामं असो, गॉसिपिंग असो, भांडणं असो किंवा टास्क असो... इथं ग्रुप बनतात. बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्येही असे ग्रुप बनले.
advertisement
4/9
मुख्य ग्रुप म्हणजे काटा ग्रुप आणि टोळी गँग. पण या दोघांत आणखी एक ग्रुप असाच तयार झाला तो म्हणजे बाल्कनी ग्रुप.
advertisement
5/9
बाल्कनी ग्रुप हा सदस्यांचा गट होता, जे सदस्य बिग बॉसच्या घरातील बाल्कनीत बसायचे आणि गॉसिपिंग किंवा चर्चा करायचे.
advertisement
6/9
तुम्ही पाहिलं असेल की बाल्कनी ग्रुपमध्ये प्राजक्ता शुक्रे, करण सोनावणे, सचिन कुमावत, सागर कारंडे, ओमकार राऊत, आयुष संजीव यांचा समावेश होता.
advertisement
7/9
बाल्कनी ग्रुप गॉसिपिंग, रणनीती, शांतपणे आणि समजूतदारपणे गेम खेळण्यासाठी ओळखला गेला. पण या सदस्यांचा गेम फार दिसला नाही. त्यानंतर एकएक करत बाल्कनीतील सदस्य एलिमिनेट झाले.
advertisement
8/9
शेवटी या ग्रुपची प्रमुख म्हटली जाणारी प्राजक्ता गेली आणि ग्रुपच संपला. ग्रुपमधील शेवटचा सदस्य ज्याला लोकांनी ग्रुपचा सेनापती म्हटलं तो शेवटी या घरात राहिला.
advertisement
9/9
आता ग्रुपच नाही तर सागरने इतर ग्रुपच्या सदस्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. नंतर तो टोळी गँगमध्ये सहभागी झाला. पण आता त्याचंही एव्हिक्शन झालं आणि तोही घरातून बाहेर गेला आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील बाल्कनी ग्रुप पूर्णपणे संपला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 च्या घरातील 'शापित' कोपरा! इथं जो गेला तो 'गायब'च झाला, नेमकं काय घडलं?