TRENDING:

5 वर्ष गुपचूप प्रेम, ऑनस्क्रिन बहिणीलाच पटवलं; थाटात केलं लग्न, हा अभिनेता कोण?

Last Updated:
मनोरंजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यानं त्याच्या ऑनस्क्रिन बहिणीशी लग्न केलं. दोघांचा 30 हून अधिक वर्षांचा सुखाचा संसार सुरू आहे.
advertisement
1/8
5 वर्ष गुपचूप प्रेम, ऑनस्क्रिन बहिणीलाच पटवलं; थाटात केलं लग्न, हा अभिनेता कोण?
अभिनय क्षेत्रात कलाकारांचे अफेअर्स, लग्न, डिवोर्स या सगळ्या गोष्टी कॉमन झाल्या आहेत. असाच एक प्रसिद्ध अभिनेता ज्याने तिच्याशी लग्न केलं ती आधी त्याची ऑनस्क्रिन बहिण होती. कालांतराने दोघे प्रेमात पडले आणि अभिनेत्यानं ऑनस्क्रिन बहिणीशीच संसार थाटला.
advertisement
2/8
आपण ज्या अभिनेत्याबद्दल बोलतोय तो अभिनेता 'द कोड' आणि 'पोन्नियिन सेल्वन' सारख्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. इंडस्ट्रीत त्याने अनेक हिट सिनेमात काम केलं आहे. तो एक प्रतिष्ठित अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. 
advertisement
3/8
आपण बोलतोय तो अभिनेता म्हणजेच जयराम. हा प्रामुख्यानं मल्याळम सिनेसृष्टीत काम करतो.  गेल्या 30 वर्षांपासून तो चेन्नईमध्ये राहतोय. पार्वती असं जयरामच्या बायकोचं नाव आहे. दोघांची लव्ह स्टोरी खूपच हटके आहे. दोघांची जोडी इंडस्ट्रीत क्लासिक जोडी म्हणून ओळखली जाते. 
advertisement
4/8
1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात जयराम चित्रपटसृष्टीत प्रवेश करत असताना पार्वती आधीच एक आघाडीची अभिनेत्री होती. त्यावेळी पार्वती एक सुपरस्टार होती. जयराम आणि पार्वती पहिल्यांदा 1988 मध्ये "अबरन" चित्रपटात एकत्र दिसले. हा जयरामचा पहिला सिनेमा होता. या सिनेमात पार्वती आणि जयराम यांनी भाऊ-बहिणीची भूमिका साकारली होती. 
advertisement
5/8
त्याच वर्षी "विटनेस" हा सिनेमा आला होता. ज्यात पार्वती जयरामची मैत्रीण होती. यानंतर जयराम पहिल्याच नजरेत पार्वतीच्या प्रेमात पडला. पार्वती तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर होती तर जयराम एक नवोदित अभिनेता होता. जयरामची विनोदबुद्धी आणि मिमिक्री पार्वतीला खूप आवडली.  "विटनेस" सिनेमाच्या सेटवर जयरामने पार्वतीला त्याच्या प्रेमाची कबुली दिली. पार्वतीने त्याला होकार दिला. 
advertisement
6/8
जयराम आणि पार्वती यांनी त्यांच्या नात्याची माहिती कोणाला सांगितली नाही. जवळपास 5 वर्ष ते गुपचूप प्रेम करत होते. सेटवर दोघेही प्रोफेशनल वागायचे. या काळात दोघांनी जवळपास 12 सिनेमांमध्ये एकत्र काम केले. त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडत होती. तर दुसरीकडे ऑफस्क्रिन त्यांचं प्रेमही वाढत होतं. 
advertisement
7/8
पाच वर्षे डेटिंग केल्यानंतर पार्वती आणि जयराम यांनी लग्नाचा निर्णय घेतला.  त्यांच्या नात्याला सुरुवातीला त्यांच्या कुटुंबियांकडून विरोध झाला. 7 सप्टेंबर 1992  रोजी त्यांचे लग्न मोठ्या थाटामाटात झालं. मल्याळम चित्रपटसृष्टीत मोहनलाल आणि मामूटी प्रमाणे, जयराम कुटुंबातील प्रेक्षकांमध्ये एक प्रिय अभिनेता बनला. दुसरीकडे पार्वतीने तिच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी सिनेसृष्टीला रामराम केला. 
advertisement
8/8
जयराम आणि पार्वती यांना कालिदास आणि मालविका ही दोन मुले आहेत. कालिदास हा दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेता म्हणून काम करतोय. मालविकानेही अलीकडेच लग्न केलं. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
5 वर्ष गुपचूप प्रेम, ऑनस्क्रिन बहिणीलाच पटवलं; थाटात केलं लग्न, हा अभिनेता कोण?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल