Trisha Krishnan: त्रिशा कृष्णननं कोणत्या कारणामुळे मोडला साखरपुडा; अभिनेत्रीने केला स्वत: खुलासा
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्री त्रिशा कृष्णन गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अलीकडेच ती टॉलिवूड अभिनेता थलापती विजय याच्यासोबत एका वेडिंग रिसेप्शनमध्ये एकत्र स्पॉट झालेली होती. तेव्हापासून त्यांच्या रिलेशनची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. थलापती विजयच्या पत्नीने त्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत कोर्टामध्ये घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. अशातच सध्या सोशल मीडियावर त्रिशाचा पहिला साखरपुडा कोणत्या कारणामुळे तुटला? याची जोरदार चर्चा होत आहे.
advertisement
1/6

कायमच आपल्या दमदार अभिनयासाठी चाहत्यांमध्ये चर्चेत राहणारी त्रिशा कृष्णन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच त्रिशा आणि थलापती विजय हे दोघंही एका लग्नाच्या रिसेप्शनसाठी उपस्थित राहिले होते. तेव्हापासून ते दोघंही सोशल मीडियावर कमालीचे चर्चेत आले आहेत.
advertisement
2/6
5 मार्चला टॉलिवूडमधील प्रसिद्ध सिनेनिर्माते कलपथी एस सुरेश आणि मिनाक्षी सुरेश यांच्या मुलाच्या वेडिंग रिसेप्शनला त्रिशा आणि विजय एकत्र स्पॉट झाले होते. तेव्हापासूनच सोशल मीडियावर त्यांच्या अफेअर्सची इंडस्ट्रीमध्ये जोरदार होत आहे.
advertisement
3/6
विजयने डिसेंबर 2025 मध्ये पत्नीसोबतच्या घटस्फोटासाठी याचिका दाखल केली आहे. ज्याची माहिती 27 फेब्रुवारी रोजी समोर आली. तेव्हापासूनच त्रिशा आणि विजयच्या रिलेशनची जोरदार चर्चा होत आहे. वैयक्तिक आयुष्यामुळे प्रकाशझोतात आलेल्या त्रिशाचा पहिला साखरपुडा मोडला आहे. 2015 साली, त्रिशाने प्रसिद्ध बिझनेसमन वरूण मनियनसोबत साखरपुडा केला होता.
advertisement
4/6
पण त्यानंतर त्यांचा साखरपुडा फार काळ टिकला नाही. काही दिवसांतच त्यांनी एकमेकांपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला. कारण, त्रिशा आणि वरूणने साखरपुडा केल्यानंतर त्याने त्रिशाला अभिनयातून एक्झिट घेण्यासाठी सांगितली होती. त्यामुळे तिने त्याच्यासोबतचं लग्न तोडलं. आज अभिनेत्री सिंगल असली तरीही करोडोंची मालकिण आहे.
advertisement
5/6
साखरपुड्याबद्दल त्रिशाने लोकांच्या वेगवेगळ्या चर्चा ऐकल्यानंतर, तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, मी आनंदी आहे, अविवाहित आहे आणि कृतज्ञ आहे. त्रिशाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये साखरपुडा मोडल्याचे कारणही स्पष्ट केले होते. मी अभिनय सोडण्या ऐवजी साखरपुडा सोडणं महत्त्वाचं समजलं.
advertisement
6/6
त्रिशाने सांगितलं की, जर मला केव्हा अभिनयातून ब्रेक घ्यायचा असेल, तर तो माझ्या प्रेग्नेंसीच्या काळामध्येच घेईल. मला जे काही काम मिळेल ते मी घेईल, पण केव्हाच मी अभिनय सोडणार नाही. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत अभिनय करत राहणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Trisha Krishnan: त्रिशा कृष्णननं कोणत्या कारणामुळे मोडला साखरपुडा; अभिनेत्रीने केला स्वत: खुलासा