Ratnagiri : गोवा भुईकोट किल्ल्याची तटबंदी ढासळली, बुरुजाचे दगडही कोसळले; पुरातत्व खात्याचं दुर्लक्ष
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
शिवाजी गोरे, रत्नागिरी : गोवा या भुईकोट किल्ल्याचे बुरुज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ठीक ठिकाणी किल्ल्याची तटबंदी ढसाळत आहे.
advertisement
1/5

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हर्णै गावात चार किल्ले आहेत. मात्र पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे या किल्ल्यांची मोठ्या प्रमाणात पडझड सुरू आहे. पाण्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्यावर वॉच ठेवण्याची महत्त्वाची भूमिका बजावणारा किनाऱ्यावरचा गोवा किल्ल्याची अलीकडे मोठ्या प्रमाणात पडझड सुरू आहे.
advertisement
2/5
गोवा या भुईकोट किल्ल्याचे बुरुज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ठीक ठिकाणी किल्ल्याची तटबंदी ढसाळत आहे. त्यामुळे किल्ला नामशेष होण्यापूर्वी किल्ल्याची दुरुस्ती करावी अशी मागणी इतिहास प्रेमी कडून केली जात आहे.
advertisement
3/5
शिवरायांचे आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचे आरमार असलेल्या किल्ल्यावर अनेक ऐतिहासिक पाऊल खुणा आहेत. समुद्रातील सुवर्णदुर्ग किल्ल्याला समुद्रकिनाऱ्यावरून रसद पुरवण्याबरोबर शत्रु वर हल्ला करण्यासाठी किनार्यावरील गोवा किल्ल्याचा वापर केला जात असल्याचे अनेक पुरावे इतिहासात आहेत.
advertisement
4/5
किल्ल्याला दोन दरवाजे आहेत एक दरवाजा समुद्राकडे भुयारी मार्ग आहे तर दुसरा दरवाजा जमिनीवर असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे या किल्ल्यातून समुद्रमार्गे सुवर्णदुर्ग किल्ल्यात अन्नधान्य व इतर युद्ध सामग्री समुद्री मार्गे पोहोचवली जात असण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
बंदरापासून अगदी जवळच असणारे फत्तेगड कनकदुर्ग गोवा किल्ला पर्यटकांचे खास आकर्षण आहेत. दरवर्षी लाखो पर्यटक या किल्ल्यांना भेटी देत असतात समुद्रातील सुवर्णदुर्ग किल्ला पर्यटकांचे खास आकर्षण आहे. त्याचबरोबर समुद्रकिनाऱ्यावर असणारा गोवा किल्ला सुद्धा तितक्याच तोडीचा असल्याने पर्यटक या ठिकाणी येऊन मनमुरादपणे आनंद लुटतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कोकण/
Ratnagiri : गोवा भुईकोट किल्ल्याची तटबंदी ढासळली, बुरुजाचे दगडही कोसळले; पुरातत्व खात्याचं दुर्लक्ष