Ahmednagar News : अर्धवट शेततळ्याने घेतला 3 चिमुरड्यांचा जीव! संगमनेरमधील घटनेचे PHOTOS समोर
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये शेततळ्यात बुडून 3 मुलींचा मृत्यू झाला आहे. (हरीष दिमोटे, प्रतिनिधी)
advertisement
1/5

पावसाळ्याच्या तोंडावर संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावात एक धक्कादायक घटना घडली आहे.
advertisement
2/5
अर्धवट काम झालेल्या शेततळ्यात पावसाचं पाणी साचलं होतं. या तळ्याच्या जवळपास खेळत असताना पाण्यात बुडून तिघा मुलींचा दुर्दैवी अंत झाला आहे.
advertisement
3/5
मेंढवण गाव येथे राहणारे 1) अनुष्का सोमनाथ बडे वय 11 वर्ष, 2) सृष्टी उत्तम ठापसे वय तेरा वर्ष, 3) वैष्णवी अरुण जाधव वय 12 वर्ष अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत.
advertisement
4/5
या तिघी शनिवारी दुपारी शाळेतून घरी आल्या आणि जेवण करून त्या सोमनाथ बडे यांचे शेतात असलेल्या शेततळ्याजवळ गेल्या. या शेततळ्यात पावसाचे पाणी साचलेले असताना सदरच्या मुली ह्या सदर पाण्यात खेळण्यासाठी गेलेले असताना खोलगट असलेल्या भागामध्ये जाऊन तिघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झालेला आहे.
advertisement
5/5
त्याबाबत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील कारवाई करीत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अहमदनगर/
Ahmednagar News : अर्धवट शेततळ्याने घेतला 3 चिमुरड्यांचा जीव! संगमनेरमधील घटनेचे PHOTOS समोर