जालन्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस, अनेक घरांची पत्रे उडाली, घटनास्थळाचे धक्कादायक PHOTOS
- Reported by:Kale Narayan
- Published by:Khushalkant Dusane
Last Updated:
नैऋत्य मान्सून ने राज्यात जोरदार धडक दिल्यानंतर राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. मुंबई पुणे, कोल्हापूर इत्यादी ठिकाणीही मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली आहे. तर मराठवाड्यामध्ये देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबादमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे जाफराबाद तालुक्यातील वडाळा येथील घरे वादळाच्या तडाख्यात सापडल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. (नारायण काळे/प्रतिनिधी, जालना)
advertisement
1/4

जाफराबाद तालुक्यात वादळाचा तडाखा बसल्याने वडाळा येथील अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. शुक्रवारी रात्री अचानक आलेल्या वादळाने मोठे नुकसान झाले आहे. या वादळात अनेक घरांवरील पत्रे उडून गेली, तर काही ठिकाणी रस्त्यावर मोठमोठी झाडे उन्मळून पडली.
advertisement
2/4
तालुक्यातील वडाळा या गावात वादळाचा सर्वाधिक फटका बसला. या गावातील अनेक कुटुंबांच्या घरांवरील पत्रे उडून गेल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाने मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
advertisement
3/4
नुकसानीचे ग्रामसेवक नेवरे व तलाठ्यांमार्फत पंचनामे करण्यात आले असून, नुकसानीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठविला आहे. दरम्यान, पावसाळ्याच्या तोंडावर घरांची पडझड झाल्याने आमचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे शासनाने त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त कुटुंबातील सदस्यांनी केली आहे.
advertisement
4/4
जाफराबाद बरोबरच जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये हलक्या हाती मध्यम स्वरूपाचा पावसाने हजेरी लावली असून यामुळे बळीराजा सुखावला आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतरच आपल्या शेतात पेरणी करावी, असं आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/जालना/
जालन्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस, अनेक घरांची पत्रे उडाली, घटनास्थळाचे धक्कादायक PHOTOS