Cyclone Shakhti: महाराष्ट्राच्या दिशेनं येतंय चक्रीवादळ, काय होणार परिणाम? हवामान खात्याचा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा धुमाकूळ पाहिला मिळाला. सध्या चक्रीवादळाचे मोठे संकट घोंगावत आहे.
advertisement
1/7

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा धुमाकूळ पाहिला मिळाला. यामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झाले. असे असतानाचं हवामान खात्याने पुन्हा धोक्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रावर सध्या शक्ती चक्रीवादळाचे मोठे संकट घोंगावत आहे.
advertisement
2/7
यंदाचे पहिले चक्रीवादळ अरबी समुद्रात सक्रिय झाले आहे. श्रीलंकेने चक्रीवादळला शक्ती हे नाव दिले आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने या चक्रीवादळाबाबत संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिदक्षतेचा इशारा जारी केला आहे. IMD नुसार, किनारपट्टीवर 100 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसादरम्यान घराबाहेर न पडण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.
advertisement
3/7
दिनांक 3 ते 7 ऑक्टोबर दरम्यान उच्च ते मध्यम चक्रीवादळ प्रभावी असू शकते. शक्ती चक्रीवादळामुळे मुंबई, ठाणे,पालघर, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या जिल्ह्यांना फटका बसू शकतो, त्यामुळे त्यांना इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे समुद्रातील स्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे.
advertisement
4/7
5 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर समुद्र खवळलेला राहील, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा कठोर इशारा मच्छिमारांना देण्यात आला आहे. उंच लाटा आणि वेगवान सागरी प्रवाह जीवानिशी धोकादायक ठरू शकतात.
advertisement
5/7
आणि सखल भागातील रहिवाशांना भरती आणि पाणी साचण्याच्या शक्यतेमुळे सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. किनारी भागांसोबतच हवामान विभागाने विदर्भाच्या पूर्वेकडील आणि मराठवाड्याच्या काही भागांतही अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. उत्तर कोकण विभागात सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची आहे.
advertisement
6/7
IMD च्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र सरकारने सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाला तातडीने सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय करण्यासोबतच, पूर येण्याची शक्यता असलेल्या भागांत नागरिकांना हलवण्याची तयारी पूर्ण ठेवण्याचे आणि जनतेपर्यंत वेळोवेळी आवश्यक माहिती पोहोचवण्याचे सांगण्यात आले आहे. समुद्रात असलेल्या सर्व नौकांना तातडीने किनाऱ्यावर परतण्याचे निर्देश दिले गेले आहेत.
advertisement
7/7
हवामान तज्ज्ञांच्या मते, मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये या चक्रीवादळामुळे होणाऱ्या अतिवृष्टीमुळे वाहतूक सेवांवर परिणाम होण्याची मोठी शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि महानगरपालिकेच्या सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Cyclone Shakhti: महाराष्ट्राच्या दिशेनं येतंय चक्रीवादळ, काय होणार परिणाम? हवामान खात्याचा अलर्ट