Weather Alert: महाराष्ट्रात रविवारचा दिवस जोरदार पावसाचा, 25 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
पुढील 24 तासांमध्ये देखील राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार तर बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
advertisement
1/7

राज्यात होत असलेला जोरदार पाऊस सुरूच आहे. पुढील 24 तासांमध्ये देखील राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार तर बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. या पावसाबरोबर विजांचा कडकडाट आणि वादळी वारे देखील वाहण्याची शक्यता आहे. पाहुयात 21 सप्टेंबर रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये साधारणपणे ढगाळ आकाश राहील तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. मुंबईतील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्गमध्ये ही विजांसह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे तर पुण्याचा घाटमाथा, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये विजांसह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. नाशिकचा घाट भाग, धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मध्यम पाऊस होऊ शकतो.
advertisement
5/7
मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी जोरदार तर कुठे मुसळधार पाऊस होऊ शकतो.
advertisement
6/7
विदर्भातील ही सर्व 11 जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे. विदर्भ आणि मराठवाडा या भागामध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
7/7
दरम्यान, राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होतेय. आगामी काळामध्ये देखील पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची तसेच जीविताची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: महाराष्ट्रात रविवारचा दिवस जोरदार पावसाचा, 25 जिल्ह्यांना अलर्ट