T20 World Cup : 'वानखेडे'चा फैसला झाला... भारत-इंग्लंड सेमी फायनलचा विनर पहिल्या बॉलआधीच ठरला?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला, तर दुसऱ्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे.
advertisement
1/8

गुरूवार 5 मार्चला भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसऱ्या सेमी फायनलचा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरूवात होणार आहे.
advertisement
2/8
भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत टी-20 वर्ल्ड कपमध्ये 5 मॅच झाल्या आहेत, यातल्या 3 मॅच भारताने आणि 2 इंग्लंडने जिंकल्या आहेत. लागोपाठ तिसऱ्या टी-20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारत आणि इंग्लंडचा मुकाबला होत आहे. 2022 च्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडचा आणि 2024 च्या सेमी फायनलमध्ये भारताचा विजय झाला होता.
advertisement
3/8
भारत आणि इंग्लंड यांच्यात वानखेडे स्टेडियमवर आतापर्यंत 2 मॅच झाल्या आहेत, यातल्या एका सामन्यात इंग्लंडने आणि दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला. टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टॉस महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
advertisement
4/8
भारतामध्ये दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन होत आहे. याआधी 2016 साली टी-20 वर्ल्ड कप भारतात झाला होता, तेव्हा नॉकआऊटच्या प्रत्येक सामन्यात टॉस जिंकणारी टीम विजयी ठरली होती.
advertisement
5/8
2016 वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडने टॉस जिंकून बॉलिंग केली आणि न्यूझीलंडला हरवलं. दुसऱ्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजने टॉस जिंकून बॉलिंग केली आणि भारताला पराभवाचा धक्का दिला. फायनलमध्ये वेस्ट इंडिजने टॉस जिंकून इंग्लंडला 4 विकेटने हरवलं.
advertisement
6/8
2016 च्या तिन्ही नॉकआऊट सामन्यांमध्ये टॉस जिंकणारी टीम विजयी ठरली. आता 2026 टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमी फायनलमध्येही न्यूझीलंडने पहिले बॉलिंग घेतली आणि दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेटने पराभव करून फायनल गाठली.
advertisement
7/8
भारत-इंग्लंड यांच्यातली सेमी फायनल नाईट मॅच आहे. 2014 वर्ल्ड कपपासून जेवढ्या नॉकआऊट मॅच रात्री झाल्या आहेत, त्यातला सगळ्या सामन्यांमध्ये पहिले बॉलिंग करणारी टीम विजयी झाली आहे.
advertisement
8/8
2014 पासून झालेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या सर्व नॉकआऊट सामन्यांमद्ये फक्त 2 वेळा पहिले बॅटिंग करणारी टीम जिंकली आणि या दोन्ही मॅच दिवसा झाल्या होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : 'वानखेडे'चा फैसला झाला... भारत-इंग्लंड सेमी फायनलचा विनर पहिल्या बॉलआधीच ठरला?