Team India : 3 खेळाडू बेदम फोडणार, दोघं सांभाळणार... टीम इंडियाचा T20 वर्ल्ड कपचा प्लान लिक!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
लागोपाठ दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकायचा आणि तोही घरच्या मैदानात, हा दुहेरी दबाव घेऊन भारतीय टीम मैदानात उतरली आहे. या टी-20 वर्ल्ड कपमधला भारतीय टीमचा प्लान लिक झाला आहे.
advertisement
1/7

टीम इंडिया यंदा वर्ल्ड चॅम्पियन बनली तर टी-20 क्रिकेटच्या इतिहासात नवा विक्रम होईल, कारण कोणत्याही टीमला लागोपाठ 2 वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. एवढंच नाही तर कोणतीही टीम 3 टी-20 वर्ल्ड कप जिंकलेली नाही.
advertisement
2/7
मागच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा कर्णधार आणि राहुल द्रविड कोच होता, तर यंदा सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व आणि गौतम गंभीरकडे प्रशिक्षकपदाची धुरा आहे.
advertisement
3/7
नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाचा खेळाडू तिलक वर्मा याने भारतीय टीमने वर्ल्ड कपसाठी केलेल्या प्लानिंगचे संकेत दिले आहेत, ज्यात 3 खेळाडूंना आक्रमक बॅटिंग करण्याची मूभा देण्यात आली आहे. तर दोन खेळाडू सावध खेळणार आहेत.
advertisement
4/7
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात भारतीय टीमला त्यांच्या प्लानबद्दल पुनर्विचार करावा लागला होता. युएसएविरुद्ध टीम इंडियाने 77 रनवरच 6 विकेट गमावल्या होत्या, अखेर सूर्यकुमार यादवने टीमला संकटातून बाहेर काढलं.
advertisement
5/7
ओपनर अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांना सुरूवातीपासूनच आक्रमक बॅटिंग करण्याची मुभा देण्यात आली आहे. संजू सॅमसनच्या बॅटिंगची स्टाईलही तशीच आहे. जर हे खेळाडू चालले टीम इंडियाचा प्लान ए यशस्वी होईल.
advertisement
6/7
आक्रमक बॅटिंग करण्याच्या नादात हे खेळाडू आऊट झाले तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करणाऱ्या तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवला इनिंग सावरण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
advertisement
7/7
टी-20 क्रिकेटमध्ये पॉवर प्ले नंतर 6 ते 16 ओव्हर या महत्त्वाच्या ठरतात, कारण या ओव्हरमध्ये जी टीम चांगली खेळते त्यांच्या विजयाची संधी जास्त असते. विकेट लवकर गेल्या तर एक-दोन ओव्हर सांभाळून खेळण्याची गरज असल्याचं कोच गौतम गंभीरही म्हणाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : 3 खेळाडू बेदम फोडणार, दोघं सांभाळणार... टीम इंडियाचा T20 वर्ल्ड कपचा प्लान लिक!