TRENDING:

Team India : वैभव-आयुषची बॅटिंग पाहिलीत, पण भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवणारे 9 हिरो कोण?

Last Updated:
अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने इंग्लंडचा 100 रननी पराभव केला आहे. टीम इंडियाने सहाव्यांदा अंडर-19 च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात टीम इंडियाने हा वर्ल्ड कप जिंकला आहे.
advertisement
1/11
वैभव-आयुषची बॅटिंग पाहिलीत, पण भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवणारे 9 हिरो कोण?
फायनलमध्ये वैभव सूर्यवंशीने 80 बॉलमध्ये 175 रनची ऐतिहासिक खेळी केली, त्यामुळे भारताने 411 रनपर्यंत मजल मारली. वैभवने त्याच्या या खेळीमध्ये 15 फोर आणि 15 सिक्स मारले.
advertisement
2/11
वैभवशिवाय कर्णधार आयुष म्हात्रेने 53 रनचं योगदान दिलं. आयुषने त्याआधी सेमी फायनलमध्ये अफगाणिस्तानविरुद्धही अर्धशतक केलं होतं, तसंच आयुषने स्पर्धेत मोक्याच्या क्षणी विकेटही घेतल्या.
advertisement
3/11
टीम इंडियाचा ओपनर एरॉन जॉर्जने सेमी फायनलमध्ये 104 बॉलमध्ये 115 रन केले, ज्यामुळे भारताने फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री केली. एरॉन जॉर्ज मनगटाच्या दुखापतीमुळे दोन मॅच खेळू शकला नाही.
advertisement
4/11
तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला येणाऱ्या वेदांत त्रिवेदीने फायनलमध्ये 32 रनची खेळी केली, पण पाकिस्तानविरुद्धच्या करो या मरो च्या सामन्यात वेदांतने 62 रनची खेळी करून भारताला अडचणीतून बाहेर काढलं.
advertisement
5/11
विहान मल्होत्रा हा अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारताचा उपकर्णधार होता. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात विहानने शतकी खेळी केली, तर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने 4 विकेट घेतल्या होत्या. फायनलमध्ये विहानने 30 रन केले.
advertisement
6/11
मुंबईच्या अभिज्ञान कुंडूने वर्ल्ड कपमध्ये 59.75 च्या सरासरीने 239 रन केल्या. बांगलादेशविरुद्धच्या कुंडूने 80 रनची आणि फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने 31 बॉलमध्ये 40 रन केले.
advertisement
7/11
ऑलराऊंडर असलेल्या आरएस अंबरिशने इंग्लंडविरुद्धच्या फायनलमध्ये 3 विकेट घेतल्या तर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याने 4 विकेट मिळवून भारताला विजय मिळवून दिला.
advertisement
8/11
ऑलराऊंडर असलेला कनिष्क चौहान पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात प्लेअर ऑफ द मॅच होता. कनिष्कने पाकिस्तानविरुद्ध 29 बॉलमध्ये 35 आणि 10 ओव्हरमध्ये 30 रन देऊन 1 विकेट घेतली. फायनलमध्ये कनिष्कने 20 बॉलमध्ये नाबाद 37 रन केले आणि 2 विकेटही मिळवल्या.
advertisement
9/11
डावखुरा स्पिनर असलेल्या खिलन पटेलने फायनलमध्ये 1 विकेट घेतली. तर पाकिस्तानविरुद्ध खिलनने 35 रन देऊन 3 विकेट मिळवल्या.
advertisement
10/11
फास्ट बॉलर असलेल्या हेनिल पटेलने युएसएविरुद्ध 5 विकेट घेतल्या होत्या. याशिवाय पटेलने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला मोक्याच्या क्षणी विकेट मिळवून दिली. फायनलमध्ये खिलन पटेलला एक विकेट घेण्यात यश आलं.
advertisement
11/11
फास्ट बॉलर असलेल्या दीपेश देवेंद्रनने फायनलमध्ये 2 विकेट घेतल्या. दीपेश देवेंद्रनकडे टीम इंडियाचा भविष्यातला फास्ट बॉलर म्हणून पाहिलं जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : वैभव-आयुषची बॅटिंग पाहिलीत, पण भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवणारे 9 हिरो कोण?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल