Chanakya Niti : तारुण्यात या 5 चुका कराल तर उद्ध्वस्त होईल म्हातारपण
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chanakya Niti in Marathi - 20 वय ओलांडल्यानंतर कोणत्या चुका करू नयेत, याचा उल्लेख आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये केला आहे.
advertisement
1/5

तारुण्य म्हणजे सळसळतं रक्त. तारुण्यात बरंच काही करण्याचा जोश असतो, त्यामुळे चुकाही होतात. अशाच काही तारुण्यातील चुका ज्या आयुष्यभर महागात पडतील. याचा उल्लेख मध्ये आहे. वयाची विशी ओलांडल्यानंतर या चुका करू नका, असा सल्ला आचार्य चाणक्य यांनी दिला आहे.
advertisement
2/5
वेळ बिलकुल वाया घालवू नका. वेळ खूप किमती आहे. एकदा का ती निघून गेली की पुन्हा येत नाही. त्यामुळे याचा अपव्यय करू नका. वेळ वाया घालवणाऱ्यांना आयुष्यभर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी वेळ पाळणं खूप महत्त्वाचं आहे.
advertisement
3/5
आळशीपणा नको. प्रत्येक कार्यासाठी तत्पर राहायला हवं. दुर्लक्षपणा केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतात. आपलं कार्य वेळेवरच करा. यामुळे जीवनात यश मिळण्याची शक्यता अधिक असते.
advertisement
4/5
धन वाया घालवू नका. पैसा विचारपूर्वकच खर्च करावा. तरुणावस्थेत पैशांचं महत्त्व समजायला हवं. पैसाच भविष्यातील संकटात कामी येतं.
advertisement
5/5
माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे राग. रागात व्यक्तीची विचार करण्याची, समजण्याची क्षमता नष्ट होते. पण वयाच्या विशीनंतर प्रतिक्रिया देताना विचार करा. तरुण वयात राग जास्त येतो. तो कंट्रोल करणंही सोपं नसतं. त्यासाठी योग आणि ध्यानाची मदत घ्या. (सर्व फोटो - प्रतीकात्मक)