Mumbai Train Blast : अत्यंत गंभीर प्रकरणातील आरोपी निर्दोष कसे काय सुटतात?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mumbai Serial Blasts Case 2006 : मुंबईत 2006 साली ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींची निर्दोष सुटका झाली आहे. 19 वर्षे तुरुंगात असलेले इतक्या गंभीर प्रकरणातील आरोपी कसे काय सुटतात, असा प्रश्न पडतोच.
advertisement
1/5

मुंबईतील 2006 सालातील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व 12 आरोपींची निर्दोष सुटका झाली आहे. लोकलमधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने हा मोठा निकाल दिला आहे. सत्र न्यायालयाने 5 जणांना फाशीची शिक्षा आणि 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आणि त्यांची सुटका झाली.
advertisement
2/5
तब्बल 19 वर्षे हे 12 जण तुरुंगात होते. इतक्या वर्षांनी कोर्टाने त्यांना निर्दोष ठरवलं आहे. हे प्रकरण काही साधं नव्हतं. यात 189 जण ठार झाले होते. तर 700 हून अधिक नागरिक जखमी झाले होते. इतक्या गंभीर प्रकरणातील आरोपी ज्यांना फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली ते निर्दोष कसे काय सुटतात असा प्रश्न पडतोच. याची अनेक कारणं आहेत.
advertisement
3/5
मुख्य कारण म्हणजे खटल्याच्या सुनावणीसाठी मिळणाऱ्या तारखांवर तारखा. खटला जितका जास्त काळ चालेल तितकाच त्याचा निकाल वाईट. एखादा मोठा खटला असेल आणि न्यायालय त्या खटल्याच्या निकालासाठी फक्त तारखा देत राहिलं तर त्या खटल्यात लोकांचा आणि वकिलांचाही रस कमी होतो.
advertisement
4/5
बऱ्याच वेळा न्यायालयाच्या तारखा वाढण्यात पोलीस आणि वकीलही याला जबाबदार असतात. पोलीस उशिरा आरोपपत्र दाखल करतात, तर वकील खटला प्रलंबित ठेवतात.
advertisement
5/5
दीर्घ सुनावणीदरम्यान साक्षीदारही गोष्टी विसरतात, साक्षीदार तुटतात, त्यांचा मृत्यू होतो. जर पोलिसांनी पुरेशा पुराव्यांसह खटला दाखल केला आणि न्यायालय लवकर निकाल देण्यावर ठाम असेल, तर आरोपी सुटू शकणार नाहीत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Mumbai Train Blast : अत्यंत गंभीर प्रकरणातील आरोपी निर्दोष कसे काय सुटतात?