Wedding Tradition : लग्न झाल्यानंतर नवविवाहित जोडपी जेजुरीलाच का बरं जातात?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Wedding Trardition Couple at Jejuri After Marriage : लग्नानंतर बहुतेक जोडपी देवदर्शनाला जातात. विशेषतः जेजुरीला आवर्जून जातात. जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेतात. पण लग्नानंतर जेजुरीलाच का जातात याचा तुम्ही विचार केला आहे का?
advertisement
1/5

तुळशीच्या लग्नानंतर आता बरीच लग्न झाली आहेत, होत आहेत आणि आणखी काही लग्न होणार आहेत. लग्न झालं की सामान्यपणे कपल देवदर्शनाला जातं. विशेषत: जेजुरीला.
advertisement
2/5
तुम्ही पाहिलं असेल की लग्न झालं की जोडपी जेजुरीला दर्शनाला जातात. सोशल मीडियावर तुम्ही असे कितीतरी व्हिडीओ पाहिले असतील.
advertisement
3/5
नवरा आपल्या बायकोला उचलून घेतो आणि जेजुरी गड चढतो. जेजुरी गडाच्या 450 पायऱ्या, प्रत्येक पायरीमागे एक एक वचन, एक आशीर्वाद असतो.
advertisement
4/5
जेजुरी गडावर पोहोचल्यावर खंडोबाचं दर्शन घेत कपल हवेत हळदीची उधळण करतात. काही जण लग्नानंतर घातला जाणारा गोंधळाचा विधीही जेजुरीतच करतात.
advertisement
5/5
जेजुरीचा खंडोबा म्हणजे शंकराचं आणि म्हाळसा म्हणजे देवी पार्वतीचं रूप आहे. जसा त्यांचा संसार सुखाचा झाला तसा आपला संसारही सुखी व्हावा अशी प्रार्थना जोडपी तिथं करतात. तर बहुतांश जोडप्यांंचं कुलदैवत खंडोबा असल्याने ते जेजुरीला जातात. (सर्व फोटो : सोशल मीडिया)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Wedding Tradition : लग्न झाल्यानंतर नवविवाहित जोडपी जेजुरीलाच का बरं जातात?