महायुतीतील भाजपा आणि शिवसेने यत पक्ष प्रवेशावरुन सुरू असलेला वाद हा चव्हाट्यावर आला आहे. भाजपाचे सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि ८ नगरसेवक शिवसेनेने फोडले. एवढच नाही तर तर कल्याण- डोंबिवली मनपा निवडणुकीकरता भाजपने निश्चित केलेले उमेदवार शिवसेनेने घेतले . यानंतर उल्हासनगरमधून भाजपाचे नगरसेवक आणि भाजपाला पाठिंबा देणा-या ओमी कलानी आणि इतर स्थानिक पक्षांसोबत शिवसेनेने जुळते करुन घेतले. एवढ्यावरच नाही तर उल्हासनगरमधीलच भाजपाचे नगरसेवक ज्यांना पक्षातून बडतर्फ केले जाणार होते त्यांना शिवसेनेने घेतले.
advertisement
शिवसेनेने केलेल्या कुरघोड्यांचा वचपा भाजपने कसा काढला?
शिवसेनेने केल्या कुरघोड्यांचा वचपा भाजपने काढला आहे. याचा वचपा म्हणून ओमी कलानी यांच्या सोबतचे 7-8 नगरसेवक भाजपाने घेतले . यानंतर अंबरनाथमधून शिवसेना सोडणारे शिवसैनिक यांना भाजपाने आपल्या गळाला लावले . यानंतर प्रकाश निकम पालघर जिल्हापरीषदेचे अपक्ष होते जे शिवसेनेला पाठींबा देणार होते त्यांना भाजपाने आपल्याकडे वळवले आहे. कैलास म्हात्रे पालघरचे शिवसेना उबाठाचे शिवसेनेत जाणार होते त्यांना भाजपाने आपल्या गळाला लावले.
शिवसेना X भाजप ठिणगीची कारणं…
- शंभूराज देसाई vs सत्यजित पाटणकर (भाजप प्रवेश)
- भरत गोगावले Vs स्नेहल जगताप (राष्ट्रवादी काॅग्रेस प्रवेश)
- दादा भुसे Vs अद्वैय हिरे (भाजप प्रवेश)
- किशोर आप्पा पाटील Vs वैशाली सुर्यंवशी (भाजप प्रवेश)
- सुहास बाबर Vs वैभव पाटील (भाजप प्रवेश)
- महेंद्र दळवी Vs सुधाकर घारे (राष्ट्रवादी प्रवेश
- संजय शिरसाट Vs राजू शिंदे
याचा वचपा म्हणुन डोंबिवलीचे भाजपाचे विकास म्हात्रे आणि 3 नगरसेवक शिवसेनेने आपल्या गळाला लावले तसंच अंबरनाथ मधील भाजपाचे नगरसेवक शिवसेनेने आपल्या पक्षात घेतले . आज शिवसेनेचे महेश पाटील, सुनिता पाटील, अनमोल म्हात्रे, सायली विचारे, संजय विचारे नगरसेवक यांचा भाजपाने पक्ष प्रवेश केला आहे.
